चंद्रपुरकरांना 61 किलो पेढे भरवून चंद्रपूर ब्राम्हण सभेने केले नववर्षाचे स्वागत – मागील दहा वर्षांपासून आयोजन
ब्राह्मण सभेचा गुढीपाडवा उत्सव सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा, नविन संवत्सराची सुरुवात. महाराष्ट्रात तसेच हिंदु धर्मियांत ह्या दिवशी नववर्षाची सुरुवात होते. एवढेच नव्हे तर कृषिप्रधान असलेल्या भारतात गुढी पाडव्यापासून नव्या हंगामाच्या आगमनाची चाहूल लागते. शेतकरी आपल्या शेतात पुजाअर्चा करून शेतीच्या मशागतीला सुरुवात करतात ह्याबरोबरच आजच्याच दिवशी शेतीच्या कामासाठी लागणारे गडी देखिल पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या कामावर रुजू होतात. सालगाड्यांचे नविन वर्ष कधी जुन्या तर कधी नव्या मालकासोबत सुरू होते.
अशा विविध प्रकारे साजऱ्या होणाऱ्या ह्या सणाचे स्वागत धूमधडाक्यात व्हावे नविन वर्षाच्या सुरुवातीला समाजातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन त्यांचे तोंड गोड करून सर्वांच्या भविष्याच्या मंगल कामनेसह आनंद साजरा करण्यासाठी चंद्रपूरच्या वरोरा नाका चौक येथे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेतर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डाॅ. राजीव देवईकर आणि डाॅ. मृदुल देवईकर, अधिवक्ता चिन्मय भागवत आणि सई चिन्मय भागवत यांचे हस्ते सकाळी सहा वाजता प्रभू रामचंद्र व भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे तसेच गुढीचे पूजन करून आरती करण्यात आली. ह्यावेळी ब्राम्हण सभेच्या सदस्यांनी 61 किलो उत्कृष्ट दर्जाच्या पेढ्याचा नैवेद्य दाखवून उपस्थितांना व नागरिकांना प्रसादाचे वितरण करून सर्व जनतेच्या भरभराटीची मंगल कामना करून तोंड गोड करण्यात आले.
तसेच गुढी पाडव्यापासून प्रभू श्रीरामाचे नवरात्र सुरू होत असल्याने उपस्थितांनी श्रीरामाचा जयघोष केला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अधिवक्ता सुनील पुराणकर लाभले तर गुढीपाडवा उत्सव नियोजन समितीमध्ये सचिन सांबरे, प्रा. महेश यार्दी, वैशाली अलोणी, शरयू मैत्र ह्यांनी हिरीरीने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अधिवक्ता रवी भागवत, सुरेश धानोरकर, डॉ विलास देवईकर, राजू तांबोळी, अनंता त्रिणेकर, आशिष पुराणिक, मंगेश देशमुख, डाॅ अरुण कुळकर्णी अधिवक्ता विनायक बापट, अभय साने, अमृत पिंपळखुटे, राजीव सराफ, प्रशांत दागमवार, रमाकांत अवताडे, सुनील ठोंबरे, संदीप देशपांडे, जयदेव रुपदे, अविनाश जोशी, संजय आलोणी, मंगेश भोंबे, महेश ताम्हण, अभिलाष देवघरे, किशोर डेहनकर, डॉ. संध्या कुळकर्णी, सीमा रूपदे, अमृता पिंपळकुटे, माणिक मंगरूळकर, रुपाली त्रिणेकर, साक्षी सांबरे, सुवर्णा यार्दी, राणी तांबोळी, स्नेहा जोशी, पिनाकी अलोणी, मीना देशपांडे तसेच बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.