मोरांगना वासियांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन
समस्याचे निवारण न झाल्यास बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया करणारं तीव्र आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यपालन अधिकारी रहमान साहेब यांना आज मोरांगना वासियांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले.
सुरेश शिर्के,विठ्ठल धुर्वे ,दमदू उईके यांना ग्रामपंचात ने CEO च्या आदेशानुसार 32000 रुपये अतिक्रमन नियमाकुल करण्यासाठी मागितले वास्तविक पाहता हे लोक 40 वर्षांपासून मोरांगना येथे राहत आहे व नियमित टॅक्स ग्रामपंचायत ला देत आहे.नियमानुसार 2000 च्या पूर्वीच्या लोकांना ही रक्कम भरणे आवश्यक नाही,असा GR आहे.परंतु ग्रामसेवक व सरपंच यांनी या लोकांना 2000 पूर्वी चा रेकॉर्ड दाखवून जुन्या पावत्या बनवून दिल्या नाही.तरीही CEO साहेबांनी ग्रामसेवक व सरपंच यांना विचारणा करून गावातील अश्या लोकांना न्याय मिळवून द्यावा.
अशी विनंती बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने करण्यात आली.यावेळी राज्य कमिटी चे सिद्धार्थ डोईफोडे,जिल्हा महासचिव अजय घंगारे,जिल्हा उपाध्यक्ष संजय हाडके,प्रवक्ते वसंत मुरारकर साहेब व निताताई गणवीर उपस्थित होत्या.समस्यांचे निराकरण लवकरात लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.