घनकचरा व्यवस्थापनचा कंत्राट नियमबाह्य पद्धतीने बहाल
महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पत्र परिषदेत आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
कंत्राट रद्द करा अन्यथा आंदोलनाचा इशारा
घनकचरा व्यवस्थापन संबंधित घंटागाडी द्वारे कचरा गोळा करणे व शौचालय बाथरूम सफाईचे कंत्राट विशिष्ट महिला बचत गटाला दिले जात असल्याचा आरोप शहरातील अन्य महिला बचत गटांनी एका पत्रपरिषदेत केला.
संबंधित महिला बचत गटास अवैधरित्या दिलेले कंत्राट रद्द करावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. कंत्राट रद्द न केल्यास आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबू असा इशारा यावेळी दिला. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महिला बचत गट चालवत असून त्याद्वारे समाजपयोगी उपक्रम राबवित आहोत. याद्वारे बेरोजगार महिलांना बांबू काम, मातीकाम आणि इतर वस्तू तयार करण्यासारखे रोजगार देऊन ते साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु गेल्या १५ ते २० वर्षापासून शहरातील तन्वी आणि समता महिला बचत गटालाच घंटागाडीचे माध्यमातून कचरा व्यवस्थापनाचे आणि बगीचा व स्वच्छतागृहांची सफाईचे काम दिल्या जाते. कंत्राट पद्धती नुसार कामाचे कंत्राट देत असताना वृत्तपत्रातून जाहिराती देणे, ध्वनी क्षेपणकाद्वारे शहरात माहिती देणे. सूचना फलकाद्वारे सूचना देणे. ही प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते परंतु या प्रक्रियेला फाटा देऊन अर्थपूर्ण संबंधातून मुख्याधिकारी ठरवलेल्याच महिला बचत गटांना कंत्राट देत आहे. या शहरात ६०० ते ७०० महिला बचत गट आहेत. यासंदर्भात मुख्याधिकारी विशाखा शेळके यांना विचारणा केली असता मला हेच काम आहे का ? अशा शब्दात दम दिला तसेच नगरपालिकेच्या प्रकल्पाधिकारी ज्योती लालसरे या सुद्धा शासनाच्या उपक्रमांची माहिती देत नसल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिले आहे. सदर नियमबाह्य दिलेला हा कंत्राट रद्द करावा अन्यथा उपोषणाला बसू असे त्यांनी सांगितले. यावेळी अनिता शाहा, मानसी देव, रत्नमाला खडसे, गीता हमदापुरे, ज्योत्स्ना कवासे, रूपाली भिडीकर, प्रतिभा रायपुरे, तृप्ती हिरादेवे, वनिता ढोके,अनु पिंपळकर, योगिता डोंगरे, छाया सहारे, कीर्ती लोखंडे, पलक धाडसे यासह अनेक महिला बचत गटाच्या पदाधिकारी पत्र परिषदेत उपस्थित होत्या.