ईद निमित्त चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ शहरामध्ये 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅली मध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. त्यामुळे रहदारीला अडथळा, जनतेला त्रास तसेच तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता चंद्रपुर शहरातील वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजतापासून दुपारी 3 वाजेपर्यंत खालील प्रमाणे वाहतुक वळविण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांनी दिले आहे.
कोहीनुर ग्राउंड-दस्तगीर चौक -मिलन चौक -गांधी चौक- जयंत टॉकीज चौक -जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक- जटपुरा गेट-कस्तुरबा रोडने कोहीनूर ग्राऊंड पर्यंतचा रस्ता, सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सदरचा रस्ता नो पार्किंग झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे.
नागपूरकडून शहरामध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळून) घुटकाळा, श्री टॉकीज, पठाणपुरा परिसरात जावयाचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगर -संत केवलराम चौक- सेंट मायकल स्कुल- सवारी बंगला चौक -नगीनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील.
नागपुर, वणी, घुग्घुस, गडचांदुरकडे जाणा-या प्रवाशांनी रहमतनगर, नगीनाबाग व इतर परीसरातून जाण्यासाठी बिनबा गेट, रहेमत नगर, दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा. बल्लारशा व मुलकडून येणा-या वाहनांना (जड वाहने वगळून) शहरामध्ये जावयाचे असल्यास बसस्टँड- एलआयसी ऑफीस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोलपंपकडून बाबुपेठ मार्गे शहरात प्रवेश करता येईल.
जनतेने जुलूस व रॅली दरम्यान वरील वाहतुक व्यवस्थेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.



