जंगलात आढळला 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह – हत्या की वन्य प्राण्याच्या हल्ल्यात झाला मृत्यु?
अस्वलाने हल्ला केला असल्याचा कुटुंबीयांना संशय
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी
मुन्ना खेडकर बल्लारपूर
येथील विद्यानगर वार्डातील रहिवाशी गणपत रघुनाथ चंदनखेडे (65) तीन दिवसापुर्वी सरपण आणण्याकरिता सैनिक शाळेच्या मागचा परिसरातल्या जंगलात गेला होता तेव्हापासून ते घरी परतले नाही. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास काही लोक जंगलात गेले असता त्यांना रघुनाथ चंदनखेडे चा मृतदेह आढळून आला. तो ओळखीचा असल्याने त्यांनी घरचाना सांगितले घरच्यांनी पोलीस आणि वनविभाग यांना कळविले. पोलीस आणि वनविभाग यांनी घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी चा पंचनामा करून शवविच्छेदन करीता पाठवण्यात आले, वनविभागाच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी कोणतेही वन्य प्राण्याचे पदचिन्ह आढळले नाही.
मागील काही दिवसांपासून पाऊस असल्याने त्या परिसरात वन्य प्राणी आले असते तर त्यांच्या पाऊल खुणांमधे पाणी जमा झाले असते. त्यामुळे हा मृत्यु वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झाला असण्याची शक्यता धूसर आहे. पोलीस विभाग देखिल घातपाताचा दिशेने तपास करीत आहे. मृतकाला तीन मुली व एक मुलगा असुन त्यांनी सांगितले की त्यांचे वडील बरेचदा दोन तीन दिवस घरी येत नव्हते व ते कधी मंदिरात तर कधी बस स्टॅन्ड परिसरात झोपायचे त्यामुळे त्यांनी वडील हरवल्याची तक्रार दिली नव्हती. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावरच नेमका मृत्यु कशाने झाला हे स्पष्ट होईल.