ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय, सोनुर्लीचे विद्यार्थी चमकले
चांदा ब्लास्ट
केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेल्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत,सोनुर्ली (वन) येथील महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथील 13 विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहेत. यात साहिल मालेकर, प्रेम देवगडे, प्राजुमन नगराळे, आयुष टेमुर्दे, आर्यन कांबळे, मणिरतन्म पडवेकर, राणी टोंगे, गौरी लांडगे, राशीं पडवेकर, आराध्या दुर्गे, प्रेरणा मोरे, शीतल वाघमारे, दिक्षा अकुलवार असे गुणवंत विध्यार्थांची नावे आहेत.
या प्रसंगी गुणवंत विध्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन कारण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, सचिव धनंजय गोरे, तथा इतर संचालकांनी,, गुणवंत विद्यार्थी, तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे व मुख्याध्यापक बि. बि. भोयर यांचे अभिनंदन केले आहे.



