ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यात पावसाचा कहर!

अनेक मार्ग बंद, हजारों हेक्टर जमीन पण्याखाली., वाहतूक खोळंबली, ११९.५ सरासरी पावसाची नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

गेली तीन ते चार दिवसांपासून संततधार पावसाचा कहर सुरु असून जनजीवन प्रभावित होत आहे.

संततधार पावसामुळे तालुक्यात अनेक घरांची पडझळ झाली असून तालुक्यातील हजारों हेक्टर शेत जमीन पाण्याखाली असल्याने घरादारासह पिकांची मोठी नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे. परिणामी, तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असली तरी आज घडीला पावसाचा जोर कायम आहे.

त्यामुळे तालुक्यात ११९.५ मिली मि सरासरी इतकी नोंद करण्यात आली त्यामधे सावली सर्कल ९३.२ , व्याहाड सर्कल ६९.०, पाथरी सर्कल १९६.४ एकूण ३५८.६ मि मि, प्रोग्रेसिव ६३३.३ मिमि. नोंद असून यात अनेक गावांचा समावेश आहे सततच्या पावसामुळे सावली- चारगांव, कापसी – ऊपरी,जिबगाव – पेटगाव, सायखेड़ा – पालेबारसा, सावली – बोथली, पाथरी – सिन्देवाही, पाथरी – मुडाळा,पाथरी – विरखल,सावली – सिदोळा, अंतरगाव – नीमगांव अशा अनेक गावालगत वाहनाऱ्या लहान – मोठ्या नाल्यातुन पानी दुथळी ओसंबुन वाहत असल्याने वाहतुकीला मोठा अङथळा निर्माण होत आहे परिणामी गोसेचे ३३ दरवाजे खुले केल्याने तालुका लगत वाहनारी वैनगंगा नदी दुथळी वाहत असल्याने नदी लगत असना ऱ्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी नदी लगत असणारी हजारों हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे.

धान पिकासःह इतरही पिकांचे मोठे नुकसान होत आहे जिल्ह्यासः ह तालुक्यात दमदार पावसाची हजेरी होऊन शेतकरी सुखवला असला तरी गेली तीन ते चार दिवसा पासून सुरु असलेला संततधार पाऊस नुकसानींला कारणीभूत ठरत असला तरी तालुक्यात ११९.५ इतकी सरासरी नोंद होत पावसाचा जोर कायम आहे सततच्या पावसामुळे नदी -नाले फुगले वाहतूक खोळबली रस्त्यावर पानी असल्याने रस्ते उखलून जाऊंन रस्त्याची वाट लागली एकंदरीत पावसाने कहर करत जनजीवन प्रभावित करीत मोठे नुक़सान केले त्यामुळे तालुक्यातील जवळपास सारेच मार्ग बंद असल्याचे दिसुन येत आहे तर अद्यापही पावसाचा जोर मात्र कायम आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये