ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिक्रमणधारी वादग्रस्त सरपंच ललित कुरेकर ग्रामपंचायत मदनी (दिदोंडा) अखेर पायउतार

ग्रामपंचायत केस नं. ७/ २०२३ पारीत दिनांक :- १२/०७/२०२३ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४ (१) (ज - ३) प्रमाणे ग्रामपंचायत सरपंच ललित कुरेकर मदनी (दिदोंडा) यांना अपात्र घोषित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वकील पियूष कदम यांनी अत्यंत उत्तमरित्या मांडणी करून प्रकरण निकाली काढले. मदनीचे सरपंच ललित कुरेकर यांनी गावातील जनतेची व शासनाची दिशाभूल करून अनेक वर्षांपासून राहत असलेल्या सरकारी जमीनीवर कब्जा केल्याचे षडयंत्र माधव वानखेडे यांनी उघडकीस आणले. अनेक वर्षांपासून राहत असलेल्या जमीनीवर सरपंच ललित कुरेकर यांनी केलेले बांधकाम ही जागा त्यांनी स्वतः हा विकत घेतली असे गावातील नागरीकांना सांगण्यात आले. त्यावर बांधकाम करून शासकीय जागेचा वापर स्वत: सरकारी हातोडा अतिक्रमणावर पडणार ?) हसाठी व परीवारासाठी करण्यात आला. ( लवकरच

इतकेच नाही तर सरपंच पदावर असतांना अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण गाजत आहे. मंगेश देवघरे ते पुरूषोत्तम किन्हाळकर यांचे घरासमोरील सिमेंट रस्त्याचे कामांत सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला. दोन लाखाचे अग्रीम पेमेंट दाखवून उचल केल्याचे स्पष्ट झाले आहे. गटविकास अधिकारी वर्धा व गटविकास अधिकारी समुद्रपूर यांचे स्पष्ट अहवालात तसे नमूद आहे. वरील भ्रष्टाचाराचे अहवालावरून मुख्यकार्यकारी अधिकारी वर्धा यांनी चौकशी करून प्रकरण आयुक्ताकडे पाठविलेले आहे. त्यावर सुद्धा लवकरच निर्णय येणार आहे.

मंगल कार्यालयाचे बांधकाम करतांना सुद्धा प्लॉट नंबर १ वर बांधकाम परवाणगी घेऊन प्लॉट नंबर २ वर अवैध बांधकाम करून अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी तसेच नगर रचनाकार वर्धा यांचे प्रकरण प्रलंबित आहे. त्यावर लवकरच चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्धा यांनी संबंधित विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहे.

असे एक नाही तर अनेक प्रकरणे ललित कुरेकर यांनी सरपंच पदावर असतांना केलेला आहे. रस्त्याचे कंत्राटदारकडून निघालेले रस्त्याचे मटेरियल आपल्या मंगल कार्यालयासाठी व स्वत: च्या ले-आऊट • मधील बांधकामासाठी वापरल्याचे सर्व जनतेला माहितच आहे.

सरपंचानी चार वर्षात कुठल्याही विकासांची कामे न करता नुसतेच आपले व आपल्या परिवाराचे भले करण्यातच घालविले. त्यासोबतच सरपंच ललित कुरेकर यांनी शासणाचा कुठलाही मोठा निधी मदनी (दिदोंडा) गावांचे विकासांकरिता आणण्याचा प्रयत्न देखील केला नाही आणि महाविकास आघाडीचे अडीच वर्ष सरकार असतांना व पक्षाच्या आमदार असतांना एकही रूपयांचा विकास निधी या गावासाठी आणू शकले नाही.

तेच भाजपा चे किसान आघाडी वर्धा जिल्ह्याचे महासचिव माधव वानखेडे यांनी १० महिण्यातच १ कोटी रूपयाचा निधी विविध योजनांमधून मदनी गावाकरीता उपलब्ध करून दिला, त्यामध्ये विठ्ठल रूक्मिणी मंदिर बांधकाम रूपये ५० लक्ष रस्त्याचे कामांकरिता रूपये १७ लक्ष, पांधन रस्त्याकरिता रूपये ४८ लक्ष व मा. खासदार रामदासजी तडस यांचे माध्यमातून आणि माजी प्रदेश – सचिव राजेश बकाने यांचे माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याचे पाणी करीता १ कोटी ५० लक्ष निधी मंजूर करण्यात आला. त्यांची कामे सुद्धा लवकरच सुरू होत आहे. मागील भाजपा शासणाच्या काळात मंजूर केलेले रस्त्याचे व बुद्ध विहाराचे कामावर आलेला निधी रूपये ३५ लक्ष सरपंचाने व आमदारने रंजित कार्बळे यांनी आघाडी सरकारचे काळात स्थगिती दिली असा आरोप माधव वानखेडे यांनी माध्यमांशी बोलतांना केला. –

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये