रामनगरमध्ये दारू सम्राटांचे साम्राज्य ; परिसरात वाहतात दारूचे पाट!
नैराश्यातून दारूबंदी उठवण्याची भावना व्यक्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
रामनगरमध्ये दारू सम्राटांचे साम्राज्य ; परिसरात वाहतात दारूचे पाट! त्यामुळेच खासदार अमर काळे यांनी केली होती नैराश्यातून दारूबंदी उठवण्याची भावना व्यक्त, रिपाई नेते महेंद्र मुनेश्वर यांनी सुद्धा अवैध दारूविक्री विरोधी उचलला विडा; रामनगरच्या ठाणेदारासह डी. बि . पथकाच्या वसुलीची चर्चा! एस.पी. जैन यांचे दुर्लक्ष का ? अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी वर्धा -/ वर्धा जिल्हा कर्मभूमी महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा दारूबंदी जिल्हा आहे,परंतु ती दारूबंदी केवळ कागदोपत्रीच. या दारूबंदी जिल्ह्यात बंदी दारू मिळते.जिल्ह्यात खुलेआम असली नकली दारूचे मोठे पाट वाहत आहे. त्यामुळेच वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे यांनी काही दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी हटवावी अशी नैराश्यातून भावना व्यक्त केली होती. त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टीचे विदर्भाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी सुद्धा अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारलेला आहे. हे मात्र विशेष! वर्धा शहरात सर्वात जास्त दारू विक्री म्हणजे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू आहे. मोठमोठ्या दारू सम्राटांचे साम्राज्य रामनगरात व इतर परिसरात पसरलेले आहे. रामनगर ठाण्याअंतर्गत अनेक ठिकाणी मुख्य चौकात, मैदानावर व इतर ठिकाणी कोणत्याही प्रतीची देशी ,विदेशी ,असली, नकली दारू सहज उपलब्ध होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात नकली दारूची सुद्धा विक्री होते. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. शासनाचा दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग हा केवळ खुर्च्या मोडण्यासाठी पांढरा हत्ती बनलेला आहे. त्यामुळे कारवाईची सर्व जबाबदारी ही पोलीस विभागाकडे दिलेली आहे. परंतु रामनगरचे ठाणेदार व त्या ठाण्यातील डी. बी. पथक हे आर्थिक देवाणघेवाणीत गुंतलेले असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे दारू विक्रेते आमचे काहीच कोणी बिघडवू शकत नाही अशा तोऱ्यात वागतात. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे दुर्लक्ष का? हा प्रश्न अनेकांसाठी अनुत्तरीत आहे . तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांच्या तक्रारींसाठी व त्यांना न्याय मिळण्यासाठी बैठका घेतल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात अनेकांना न्याय मिळाला.
परंतु आता तर पोलीस स्टेशनचे वेगळे चित्र आहे. तक्रारदार तक्रार करण्यासाठी येतो व त्यांना एनसी पावती मिळते. असा एक अनुभव गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये एका विद्यार्थीनी असलेल्या तक्रारकर्तीला आला. सदर विद्यार्थिनीने आपल्या तक्रारीत नमूद केले की ,माझ्या भ्रमणध्वनीवर एका अज्ञात युवकाने माझा फोटो एका जणांसोबत जोडून माझ्या व्हाट्सअप वर पाठविला व त्या अज्ञात युवकाने सदर फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली व तो इथवरच थांबला नाही तर त्याने व्हायरल न करण्यासाठी खंडणीची सुद्धा व्हाट्सअप वर मागणी केली. अशी तक्रार रामनगर पोलीस स्टेशनला दाखल केली. परंतु घटनेची गंभीरता तेथे तैनात स्टेशन डायरीवर असलेल्या ड्युटी अधिकाऱ्यांना कळली नाही. त्यांनी त्या विद्यार्थिनीला एनसी पावती देऊन समजावून वापस पाठविले. या गंभीर तक्रारी संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल या विभागाला सुद्धा रामनगर पोस्टे ने माहिती पाठवली नाही. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला आपले कर्तव्य समजले नाही का? हा गृह विभागासाठी संशोधनाचा विषय ठरत आहे? केवळ इतर आर्थिक देवाण-घेवाणीसाठी रामनगर पोलीस स्टेशन परिचित झालेले आहे हे मात्र उल्लेखनीय! यासंदर्भात सदर विद्यार्थिनी न्याय मागण्यासाठी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेणार आहे. कारण रामनगर पोलीस स्टेशनला या प्रकरणाची गंभीरता कळलेली नाही.