ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंगुलिमाल उराडे प्राणीमित्र पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : साहित्यरंग साहित्य मंच नाशिक आयोजित कवी संमेलन व सन्मान सोहळा २०२५ आय एम आर कॉलेज, जळगाव येथे २२ जून रोजी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात जिल्यातील बेंबाळ येथील अंगुलीमाल उराडे यांना समाजसेवा प्राणीमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

जिल्ह्यातील बेंबाळ येथील कवी, लेखक अंगुलीमाल उराडे अनेक सामाजिक साहित्यिक क्षेत्रात अग्रेसर असून ते सर्पमित्र सुद्धा आहेत. त्यांनी अनेक प्रकारच्या सापांना पकडून वनविभागात दिले आहे. तसेच त्यांचा नुकताच ” हे विश्व शब्दांचे ” कवितासंग्रह प्रकाशित करण्यात करण्यात आलेला असून ही साहित्यकृती महाराष्ट्रभर चर्चिली जात आहे. यातच त्यांना नाशिक येथील साहित्यरंग साहित्य मंच या प्रतिष्ठित संस्थेचा पुरस्कार मिळाला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यात सुद्धा त्यांनी आपली काव्य रचना सादर करुन उपस्थित काव्य रसिकांची माने जिंकली. या प्रसंगी उपस्थित कला फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गझलकार यशवंत पगारे होते, स्वागताध्यक्ष सुधीर महाजन तर प्रमुख उपस्थितीत मदनराव कुलकर्णी, जनाबाई हिरे, प्रकाश पाटील, सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रामुख्याने उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते अंगुलीमाल उराडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये