ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कंत्राटदारांच्या बिलातून कापण्यात येत असलेला पैसा शासनाकडे भरावा
राज्य अभियंता संघटनेचे जिल्हा परिषद कार्यालयात निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ग्रामपंचायत विभागामार्फत विविध विकास कामे कंत्राटदारांकडून करण्यात येतात. कंत्राटदारांच्या या कामांच्या बिलातून टीडीएस व इन्कम टॅक्सची नियमानुसार कपात केल्या जाते. मात्र सदर कपात केलेली रक्कम प्रत्यक्षात शासनाकडे भरली जात नाही. त्यामुळे शासनाच्या महसुलावर परिणाम होतो आणि कंत्राटदारांच्या आर्थिक व्यवहारातही पारदर्शकता राहत नाही. त्यामुळे या बाबीची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत योग्य त्या सूचना द्याव्या.
अशी मागणी राज्य अभियंता संघटना शाखा चंद्रपूर तर्फे संघटनेचे अध्यक्ष जगदीश लबाडीया यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.