ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुसच्या रस्त्यांची व सफाई समस्येची गंभीरता

मनसेने नगरपरिषदेवर चढवला जोरदार ताण, १५ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपूर : घुग्घुस शहरातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नगरपरिषदेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहराध्यक्ष सुमीत कोहले, उपाध्यक्ष निशांत ठाकरे आणि निखिल बोबडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने दोन स्वतंत्र निवेदने नगरपरिषदेला सादर केली असून, खराब रस्त्यांची दुरुस्ती, नाल्यांची सफाई, सार्वजनिक स्वच्छता आणि धार्मिक स्थळ परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पहिल्या निवेदनात शहरातील अनेक वर्षांपासून पडून असलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधून मनसेने सांगितले की, पोलिस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बस स्थानक परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व वाहनचालक यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने स्पष्ट इशारा दिला की, जर १५ दिवसांत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर आंदोलन छेडले जाईल.

दुसऱ्या निवेदनात हनुमान मंदिर चौक ते अमराई रोडपर्यंतच्या परिसरातील कचरा, जलतारण आणि सफाई व्यवस्थेच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पावसाळ्यात मंदिर परिसरात साचणारे सांडपाणी व दुर्गंधीमुळे भक्तांना अडचणीचा सामना करावा लागत असून, साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून नियमित साफसफाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे दोन्ही निवेदने दिनांक 18/06/2025 रोजी नगरपरिषदेने स्वीकृत केली असून, त्यावर अधिकृत शिक्काही मारण्यात आला आहे. तरीही, जर वरील मागण्या वेळेत पूर्ण केल्या गेल्या नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा मनसेने दिला आहे।

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये