ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दैना कादंबरीच्या लेखनितुन पारधी समाजाला न्याय मिळऊन देण्याच काम लेखक भास्कर भोसले यांनी केले आहे – सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सामाजिक उपक्रमांमुळे तरुणपिढीला प्रेरणामिळते परंतू कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरीकांचे सहकार्य महत्त्वाचे असते असे मत ऊरळी कांचन पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांनी व्यक्त केले.

या दोन बांधवाच्या लेखणीने आणि समाजीक कार्यामुळे आदिवासींचे नाव उंचावले,भास्कर भोसले आणि नामदेव भोसले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात भयानक हालाखीत परखड पणे साहित्याची चळवळ सुरु केली “दैना, “मराशी, ” ये हाल, वेदना आदिमानवाची या आदिवासी साहित्यामुळे महाराष्ट्रातील आदिवासींना न्याय मिळाला, भोसले बांधवानी केलेले काम सदैव सर्वासाठी प्रेरणादायी ठरलेआहे याचे आम्ही साक्षीदार आहोत असे मत टिळेकर वाडी देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी शेवराई सेवाभावी संस्थाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष व आदिवासी समाजसेवक, साहित्यिक.नामदेव भोसले याच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष संन्मान करण्यात आला.

यावेळी साहित्य आकादमी ओडीसा यांनी साहित्य आकादमी संमेलनामध्ये जेष्ट साहित्यिक. भास्कर भोसले प्रमुख म्हणून निमंत्रीत होते या वेळी आदिवासी लेखक म्हणून त्यांना संन्मानीत करण्यात आले होते,ऊरुळी कांचन पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांच्या हस्ते भास्कर भोसले यांना सन्मानित करण्यात आले.या वेळी टिळेकर वाडी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून संतोष (बाबू) टिळेकर, तर देवस्थान ट्रस्टच्या उपाध्यक्ष पदी राजेंद्र टिळेकर यांची बिन विरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान जेष्ट विचारवंत पोपटराव ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी उपस्थित असलेले आदर्श सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौवरे, टिळेकर वाडीचे पोलीस पाटिल विजय टिळेकर,भवरापुर ग्रामपंचायतचे पोलीस पाटिल चंद्रकांत टिळेकर, रियाज मनियार, स्वप्रित भोसले, उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये