जिल्ह्यातील धरणातील गाळ काढण्याचे कामास प्राधान्य देण्याचे निर्देश
(जलसंधारण विभागाकडून संपूर्ण राज्यात बी जे एस च्या सहकार्याने होणार गाळमुक्त धरण योजना)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संपूर्ण राज्यात “पाणी आडवा पाणी जिरवा” या योजनेत जलसंधारणाचे कामाला सुरुवात झालेली असून लहान मोठे धरण, नाले, नद्या, यामधील गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे उपस्थितीत मुंबई येथे करण्यात आल्यानंतर मृद व जलसंधारण विभागाचे वतीने ठीक ठिकाणचे धरणातील गाळ काढण्यासाठी आराखडे तयार करण्यात येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात असणारे धरण नद्या नाले यांचा सर्वे करण्यात आलेला असून यातील गाळ काढण्याचे कामास प्रथम प्राधान्य देण्याबाबत चे निर्देश संबंधित यंत्रणेला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आयोजित बैठकीत दिले.
याबाबत सविस्तर असे की महाराष्ट्राला पाणीटंचाईपासून मुक्त करण्यासाठी व “सुजलाम सुफलाम”होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात ‘पाणी आडवा पाणी जिरवा” ही योजना युद्ध पातळीवर कार्यान्वित करण्यात आलेली असून यासाठी वेगळ्या निधीची राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद करून ठेवली आहे महाराष्ट्र शासनाने हे काम करण्यासाठी भारतीय जन संघटना नाम फाउंडेशन व टाटा ट्रस्ट सोबत सामंजस्य करार केलेला आहे यामध्ये लहान मोठी धरणे नद्या नाले यातील गाळ काढून सिंचन क्षमता वाढवण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सर्वप्रथम या गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्याचे दृष्टीने भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य सन्मती जैन यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या सोबत संपर्क करून याबाबत संबंधित यंत्रणा प्रमुखांसोबत मीटिंग लावण्याचे सुचविले वरून दिनांक 27 फेब्रुवारी रोजी या गाळ काढनेचे कामाचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंगचे आयोजन करण्यात आले यामध्ये मृद व जलसंधारणाचे संबंधित अभियंता यांनी जे अंदाजपत्रक तयार केलेले आहे त्यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली यामध्ये सद्यस्थितीत विविध 109 लहान मोठ्या धरणातील गाळ काढण्याचे निश्चिती केली असून प्रत्यक्षात 32 कामांचे कार्यारंभ आदेश एजन्सीला देण्यात आलेले आहे.
उर्वरित कामाचे कार्यारंभ आदेश दोन दिवसात देणे बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या व या व्यतिरिक्त जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी गाळ काढणे अपेक्षित आहे त्या त्या ग्रामपंचायतीने याची माहिती मृद व जलसंधारण विभाग व भारतीय संघटनेचे पदाधिकारी यांना देणेबाबत आव्हान केले यावेळी बीजेएस चे राज्य कार्यकारणी सदस्य सन्मती जैन सुजलाम सुफलाम चे माजी अध्यक्ष राजेश देशलहरा पश्चिम विदर्भ अध्यक्ष कीर्तीकुमार वायकोस, जिल्हाध्यक्ष मंगलचंद कोठारी, सुजलाम सुफलाम चे जिल्हाध्यक्ष विनोद कुमार सुराणा, देऊळगाव राजा चे शहराध्यक्ष पियुष खडकपूरकर मुन्ना बेगानी उपस्थित होते.