दहावीच्या विद्यार्थ्यांना व उपमुख्याध्यापक तुराणकर यांना निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री शंकरराव तुराणकर यांना एकाच वेळेस निरोप देण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक श्री शंकरराव तुराणकर, उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षिका सौ विणा देशमुख आणि ज्येष्ठ शिक्षिका जुबेदा शेख उपस्थित होत्या.
याप्रसंगी मान्यवरांनी उपमुख्याध्यापक श्री तुराणकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व श्री तुरानकर सर यांनी सत्काराच्या उत्तरात आपले मनोगत व्यक्त केले. नंतर वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभी आपल्या मनोगतात शिक्षकांप्रती आपले आभार व विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ विना देशमुख यांनी केले त्यानंतर श्री प्रफुल्ल माहूरे यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतर काय? याविषयी मार्गदर्शन केले व अध्यक्षीय भाषणात श्री साईनाथ मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे संचालन वर्ग नववीच्या विद्यार्थिनी कुमारी नंदनी राय व कुमारी आकाशी शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी श्रेया मंदे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.