चोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे थाटात उद्घाटन
निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय तसेच स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा यांचा स्तुत्य उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय, चोरा येथे संपन्न झाले.
या शिबिराच्या उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, उद्घाटक, माननीय डॉक्टर विवेक शिंदे, अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, विशेष अतिथी माननीय धनराज अस्वले, माजी प्राध्यापक, बेहरीन गल्फ, प्रमुख अतिथी, सौ. संगीता खिरटकर, सरपंच, चोरा, उपसरपंच, श्री विलास जीवतोडे, उपसरपंच, चोरा, श्री दयानंद तिडके, ग्रामसेवक, श्री सागर सागुरले, पोलीस पाटील चोरा, श्री संजय गोडे, सहाय्यक शिक्षक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. कुलदीप भोंगळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून व उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागताने झाली. सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कुलदीप भोंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून देशाच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासात डिजिटल साक्षरतेमध्ये युवकांचे योगदान या संकल्पनेवर आधारित या शिबिराचा आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे असे स्पष्ट केले.
सर्वप्रथम या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ. संगीता खिरटकर, सरपंच, चोरा यांनी विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी कला गुण असणे आवश्यक आहे त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे असे आवाहन करीत सरपंच या नात्याने सर्वस्वी मदत करण्याचे आश्वासन दिले.
तसेच विशेष अतिथी श्री धनराज अस्वले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत माणूस हा किती मोठा झाला तरी तो आयुष्यभर विद्यार्थीच असतो त्याने सतत काहीतरी नवीन शिकण्याची आवड ठेवावी. डिजिटल युगामध्ये आपल्याला पुस्तकी ज्ञान मिळते परंतु समाजात कसे राहावे हे मिळत नाही. माणसाने क्षणिक सुखाच्या मागे न जाता जीवनात कोणताही शॉर्टकट घेऊ नये. जीवनामध्ये पुढे जात असताना आई-वडिलांना विसरू नये. विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जायचे असेल तर वेळेला महत्त्व द्या तरच जीवनात पुढे जाऊ शकता असे मनोगत वेक्त केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर विवेक शिंदे, अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. प्रत्येक खेडेगाव हा देशाचा आरसा असतो. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात जाऊन आपले विचार मांडत जावे. आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधत जा. नेहमी जिज्ञासू वृत्ती ठेवावी असे मोलाचे मार्गदर्शन केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक सौ. अपर्णा धोटे, प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी, प्रा. कुलदीप भोंगळे तर आभार प्रदर्शन प्रा. एलटी सचिन श्रीरामे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. एलटी सचिन श्रीरामे, डॉ के. पी. जुमडे, श्री शरद भावरकर, रागिनी निखाडे, कोमल जंगापल्ली, अनामिका चौधरी, प्रीतम आसमपल्ली वार, निखिल भुसेवार व प्रणय दडमल यांनी अथक परिश्रम घेतले.