वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर : टेन्शन घेऊन मुलं आत्महत्त्या करतात असाच एक दुर्देवी प्रकार समोर आला असून चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर येथील 15 वर्षीय मुलाने वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून बाहेरगावी गेलेल्या आईवडिलांच्या पश्चात स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळी समोर आली आहें, या घटनेने रमाबाई नगर वार्डात शोककळा पसरली आहें.
आत्महत्त्या केलेल्या मुलाचे नाव समवेल धर्मेद्र मेश्राम वय 15 वर्ष असून तो शाळेत शिकत होता, दरम्यान त्याच्या शिक्षकाने वडिलांना शाळेत बोलावून तुमचा मुलगा अभ्यास करत नाही असे म्हणून मुलाकडे लक्ष द्या असे समजावून सांगितले, वडिलांने मुलाला समज दिली की तू मोबाईल जास्त वापरू नको, त्यामुळे तुझं शिक्षण वाया जातं आहें.
दरम्यान काल सकाळी नातेवाईक यांच्या कार्यक्रमासाठी आई वडील जायला निघाले असता आमच्यासोबत तू पण चल असे म्हणून मुलाला सांगितले पण मुलगा म्हणाला की मी घरीच राहतो फक्त मला टाईमपास करण्यासाठी मोबाईल द्या पण अगोदरचं शिक्षकांने वडिलांना तंबी दिल्याने वडिलांनी मुलाला मोबाईल दिला नाही व तू अभ्यास करं आणि टीव्ही बघ असे म्हणून ते बाहेरगावी निघून गेले, काल सायंकाळी ते परत आले तर घरी मुलगा गळफास घेऊन दिसला आणि ते दृष्य पाहताच आई वडिलांनी एकच टाहो फोडला, मोबाईल चं वेड लहान मुलांचं जिवन कसं उध्वस्त करत याचं हे दुर्दैवी उदाहरणं समोर आहें.