ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तरुणांच्या सुदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळावर भर देणे आवश्यक – डॉ. रामप्रसाद शेळके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 शहरी व ग्रामीण भागातील तरुणांना शिकवणी,संगणक, टी .व्ही. मोबाईल गेम यामध्येच गुंतवून ठेवले जात आहे. हि परिस्थिती बदलण्यासाठी मैदानी खेळावर भर देणे आवश्यक आहे,असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, तथा राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कुल चे अध्यक्ष डॉ रामप्रसाद शेळके यांनी व्यक्त केले.देऊळगाव मही प्रिमियर लीग 21 च्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले खेळा मुळे साहसी पिढी तयार होते, खेळा मुळे यश अपयश पचवण्याची सवय लागते, आत्मविश्वास वाढतो त्यामुळे तरुणांनी मैदानी खेळ जास्त खेळावे असेही डॉ शेळके म्हणाले.

मोबाईल गेम मुळे पुर्वीचे खेळ इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे असे समाधान शिंगणे यांनी सांगितले.

   संगणक, मोबाईल, टीव्हीमुळे आजच्या युवा पिढीला मैदानी खेळांचा विसर पडत चालला आहे.पुर्वीचे विटीदांडु, सुरपारंब्या,क्रिकेट, कब्बडी,खो- खो हे खेळ इतिहासजमा होत आहेत. काही वर्षांपूर्वी शहरातील मुलांना सुट्टीच्या दिवशी खेड्यात जायचे म्हटले की धमाल वाटायची.शहरात गुदमरून राहत असलेली मुले खेड्यात बिनधास्त खेळायची. झाडावर चढणे, नदीवर पोहायला जाणे, अशा प्रकारचे अनेक खेळ दिवसभर चालायचे.हे सर्व खेळ इतिहासजमा होत आसल्याची खंत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती समाधान शिंगणे यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये