पुनर्वसन करिता गरमसुर, येनीदोडका,मेटहिरजी,मरकसुर, उमरविहारी या पाच गावांचा तहसीलदाराकडून सर्वे
मात्र या गावांचे पुनर्वसन न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा गावकऱ्यांचा निर्णय
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दी. 4 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा वर्धा,बोर व्याघ्र प्रकल्पातील गाव मौजा,गरमसुर,येनिदोडका, मेटहिरजी,मरकसुर, उमरविहारी अशा पाच गावांचा सर्वे मां .मॅडम उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्धा यांच्या सल्ल्यानुसार करण्याचे ठरविण्यात आले होते.
त्या अनुषंगाने सेलू तालुक्यातील तहसीलदार श्री नरवडे सेलू पं.स.सेलू गट विकास अधिकारी श्री.पाणबुडे ,पुनर्वसन अधिकारी व संपूर्ण कर्मचारी महसूल विभाग तथा वनविभाग बोर व्याघ्रप्रकल्प डी. एफ. ओ. ठेगडी साहेब तसेच तहसील आणि पंचायत समिती व बोर व्याघ्रप्रकल्प अधिकारी यांची संपूर्ण टीम यांच्या समोर पाच ही पुनर्वसित गावातील समस्या मांडण्यात आल्या.येथील परिस्थिती भयावह,रोज भीतीदायक प्रवास,फक्त शेती हेच उपजीविकेचे साधन असून नागरिकाच्या वतीने सुभाषराव वैरागडे शिवसेना विधानसभा प्रमुख वर्धा यांनी पुनर्वसन आणि नागरी सुविधा सबंधित चर्चा केली आणि येत्या काही दिवसात पुनर्वसन करण्याच्या कामाला गती मिळावी अशी मांगणी केली.
तसेच गावचे सरपंच,उपसरपंच, पुनर्वसन समिती, गरमसुर डोंगरे यांनी आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही संपूर्ण पाच ही गावाच्या वतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर समस्त ग्रामस्थ बहिष्कार करू असे सांगण्यात आले.