Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धाची विधानसभा महाविकास आघाडीने सहयोगी घटक मित्र पक्षांना सोडावी – महेंद्र मुनेश्वर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याच अजेंड्याचे वर्धेतील शिदोरी आंदोलन हे फसवे सुत्र ठरले आहे.त्यामुळे रिपाइं (आंबेडकर) पक्षाने या आंदोलनात सहभाग घेतला नाही.महाविकास आघाडी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वर्धा विधानसभेत जागा मिळवण्यासाठी,घटक पक्ष व मुस्लिम अल्पसंख्यांक समाज,पुरोगामी विचाराच्या संघटनावर जाळे टाकत असल्याचा हेतु या आंदोलनातुन दिसुन आला आहे.हे निराशा जनक चित्र आहे.महाविकास आघाडीच्या वर्धा जिल्ह्यातील नेत्यांनी जातीयवादी रामगिरी महाराज यांच्या मुस्लिम समाज विरोधी वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे होती.का दिली नाही.फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठी मुस्लिम समाज अल्पसंख्यांक व आंबेडकरी समाजाला सामिल व्हा असे सांगता का ? असा सवाल रिपाइं (आंबेडकर) विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना करुन जातीयवादी रामगिरी महाराज यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्याचा निषेध केला आहे.

महाविकास आघाडीत सामिल असलेल्या घटक पक्ष माकप, भाकप, आप रिपाइं (आंबेडकर) व मुस्लिम अल्पसंख्यांक समाज तसेच आंबेडकरी,पुरोगामी संघटनांच्या वाट्याला वर्धा विधानसभा मतदार संघ सोडावा! फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेने वर्धा विधानसभा मतदार संघात आम्ही महाविकास आघाडी तर्फे निवडणूक लढणार हक्काचा आमदार निवडून आणणार !

: – महेंद्र मुनेश्वर

वर्धा :

महाविकास आघाडी ने राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांनी वर्धा जिल्ह्यामधील चारही विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी यांच्यातच जागावाटपावरून स्पर्धा व विवाद सुरू आहे.त्यातही वर्धा विधानसभा मतदार संघात एकमत नाही.वर्धा मतदार संघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच आंबेडकरी, मुस्लिम व पुरोगामी संघटनांचे नेते,कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.त्यामुळे आमचा पण दावा या मतदार संघावर आहे.राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाने वर्धा मतदार संघात उमेदवारीसाठी दावा करु नये.वर्धा ची विधानसभा महाविकास आघाडीने सहयोगी घटक मित्र पक्षांना सोडावी.असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)पक्षाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जो पर्यंत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा निर्णय होत नाही तोपर्यंत रिपाइं (ए) तथा आंबेडकरी कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या आंदोलनात सहभागी होणार नाहीत,महाविकास आघाडीचे आंदोलन हे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याच अजेंड्याचे फसवे सुत्र दिसते.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वर्धा विधानसभेत जागा मिळवण्यासाठी,घटक पक्ष व पुरोगामी विचाराच्या संघटनावर जाळे टाकत असल्याचा हेतु शिदोरी आंदोलनातुन पुढे आला आहे.हे निराशा जनक चित्र आहे.आंदोलनातून शेतकरी कष्टकरी,तरुण सुशिक्षित बेरोजगार व सामान्य जनतेची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी फसवणूक केल्याचा आरोपही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये