ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्याची गरज – प्रा विजय आकनुरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे रासेयोचे माजी जिल्हा समन्वयक प्रा विजय आकनुरवार यांनी केले ते ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जगदीश ठावरी,माजी मुख्याध्यापक नामदेव ठेंगणे, विकास अवघडे,प्राचार्या निर्मला ठावरी आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण जगदीश ठावरी यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले विविध स्पर्धा, गीत गायन,नृत्य, भाषण स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमाला गावातील पालक विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये