प्रेरणा महाविद्यालय गडचांदूर येथे स्वच्छता ही सेवा उपक्रम साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर च्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता पंधरवडा’ ‘स्वच्छता ही सेवा’ २०२३ अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख एक तास’ हा स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
सदर उपक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण व दीप प्रज्वलन करून झाली.केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महात्मा गांधी जयंती निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून गडचांदूर शहरातील बस स्थानक परिसर, माणिकगढ चौक, पोलिस स्टेशन, महाविद्यालय परिसर, मध्यवर्ती रस्ताच्या दुतर्फा बाजू या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
गडचांदूर शहरामध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी असल्याने विद्यार्थ्यांनी सोबत कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक वस्तू आणू नयेत असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते.याची सक्त अंमलबजावणी विद्यार्थ्यांनी केली. स्वच्छता ही सेवा उपक्रमात सहभागी होऊन गडचांदूर शहराच्या स्वच्छतेत आणखी भर पाडण्यासंदर्भात गावातील नागरिकांना विद्यार्था कडून सदर मोहिमेत सहभागी होण्यासाठी आव्हान केले जात होते.
सकाळी १० ते ११ पर्यंत प्रेरणा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम पार आली. त्यानंतर महाविद्यालयात स्वच्छतेच्या संदर्भात मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे उपस्थित होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात जरी असले तरी स्वच्छतेचे पालन सर्वांसाठी आवश्यक आहे. स्वच्छता बऱ्याच प्रकारची असू शकते जसे सामाजिक, व्यक्तिगत, वैचारिक इ. आपण प्रत्येक क्षेत्रात स्वच्छतेचे पालन करायला हवे. विचारांची स्वच्छता आपल्याला एक चांगला व्यक्ती बनवते, व्यक्तिगत स्वच्छता आपल्याला रोगापासून वाचवते. आणि सामाजिक स्वच्छता एक सशक्त समाज घडवते. म्हणून स्वच्छतेसाठी आपल्याला नेहमी कार्यरत राहायला हवे.असे मार्गदर्शन केले.तर कार्यक्रम अधिकारी प्रा.एजाज शेख यांनी रोगांना वाढवण्या पेक्षा, आपण स्वच्छतेकडे लक्ष दिलेले केव्हाही चांगलेच. आणि म्हणून सर्वांनी स्वच्छतेचे नियम पाळायला हवेत. व्यक्तिगत स्वच्छता सोबत वैचारिक स्वच्छता पण खूप महत्त्वाची आहे. विचारांची स्वच्छता असेल तर आपण एक चांगले व्यक्ती बनतो.
असा व्यक्ती स्वतःच्या विकासासोबत समाजाचा सुद्धा विकास करतो. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राहुल ठोंबरे,प्रा. मनीषा मरस्कल्ले, प्रा. सचिन पवार,प्र. रोशनी खाते, प्रतीक मुन, गजानन रामभारती, उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मनीषा मरस कोल्हे यांनी केले तर संचालन रविंद्र पवार व आभार अंकिता सुरतीकर हिने मानले.