ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगांव महीत संत मुक्तामाईंच्या पालखीचे स्वागत

शहरात भक्तिमय वातावरण ; वारकऱ्यांना चहा फराळ वाटप 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर येथील विठुरायांच्या भेटीसाठी निघालेल्या संत आदिशक्ति मुक्तामाईंच्या पालखीचे (दि. 25 जून) रोजी मंगळवारला देऊळगांव राजा तालुक्यातील देऊळगावमही शहारात टाळ मृदंगाच्या निनादात आगमन् झाले.

यावेळी शहरातील भाविकांच्या वतीने पालखीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मुक्तामाईंची पालखी पंढरपुर जाण्यासाठी मार्गस्थ झाली आहे. ही पालखी राज्यातून सर्वात आधी पंढरपुर जाण्यासाठी निघते या आषाढी एकादशीची 222 वर्षांची परंपरा लाभली आहे. 35 तालुक्यासह अनेक शहरातून व् खेड्या गावातुन पालखी मार्गक्रम करणार आहे. पालखी शहरात टाळ मृदंगाच्या निनादात मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाईच्या जय घोषात दाखल झाली होती. ही पालखी देऊळगांवराजा, जालना, अंबड, बीड, आष्टी मार्गे पंढरपूरला मार्गस्थ होणार आहे. ठिकठिकाणाहुन वारकरी व भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे. शहरात पालखीचे आगमन होताच विठ्ठल मंदिर भजनी मंडळ व एकता ग्रुपच्या ढोल पथकाने पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले. ढोल पथकाच्या समवेत गावातुन पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी स्वागतासाठी महिलांनी पालखी मार्गात सडा रांगोळी काढून आनंदमय वातावरण पसरले होते.

वारकऱ्यांना चहा पाणी व फराळ वाटप

शहरात पालखीचे आगमन होताच ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करून वारकऱ्यांना चहा पाणी व फराळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी भक्तिमय वातावरण होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये