गरिबांच्या पोटाची तमा बाळगता महानगरपालिकेची हुकूमशाही
अतिक्रमणापेक्षा पावसाळी उपाययोजनाकडे लक्ष द्या
चांदा ब्लास्ट
काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी मनपा आयुक्तांकडे मागणी
रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका, पोलीस विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये शहरातील अनेक गरीब व छोट्या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवण्यात आले आहे. परंतु, मोठ्या बिल्डरचे अवैध बांधकाम न तोडता
केवळ गरीब कष्टकरी लोकांचे रस्त्यावरील छोटे व्यवसाय हटविण्यात आले आहेत. यावर चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी या कारवाईवर तीव्र टीका केली आहे. “पावसाळा जवळ येत असताना महानगरपालिकेने ही कारवाई तात्काळ थांबवून पावसाळी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”, अशी मागणी केली आहे.
चंद्रपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध, बांधकाम पार्किंग नसलेले बांधकाम आहेत. मात्र,केवळ गरीब लोकांचेच अतिक्रमण अशा हुकूमशाही पद्धतीने काढण्यात येत आहे. रितेश (रामू) तिवारी यांनी आरोप केला आहे की, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल गरीब लोकांच्यावर अत्याचार करत आहेत. पालीवाल हे केवळ गरीब लोकांचे अतिक्रमण हटवत आहेत, तर श्रीमंत लोकांचे अतिक्रमण आणि अवैध बांधकाम काढण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य व्यवसायिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या कारवाईमध्ये अनेक दुकानाचे बोर्ड, दुचाकी वाहन, विक्रेत्यांचे रस्त्यावर ठेवलेले ट्रॉली, अनेक दुकानदारांचे फुटपाथवर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. पत्र्याचे शेड अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात आले आहे.
महानगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमुळे अनेक गरीब व्यवसायिकांवर परिणाम होत आहे. अनेक गरीब कष्टकरी लोकांचे रस्त्यावरील छोटे व्यवसाय उघड्यावर आले आहेत. गरीब व्यवसायिकावर होणारा हा अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा देखील रितेश तिवारी यांनी दिला आहे.