Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

प्रशासनाने भद्रावती  परिसरातील ब्लास्टींग सदृश्य धक्यां संदर्भातील जनतेचा संभ्रम दुर करावा : रविंद्र शिंदे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

           शहरात एक आठड्यापासून सकाळी ९.३०  वा. च्या सुमारात दररोज ब्लास्टींग सद्दश्य धक्के बसत आहे. यामुळे शहरातील जनतेत  भितीचे वातावरण पसरले  असून प्रशासनाने भद्रावती  परिसरातील ब्लास्टींग सद्दश्य धकक्यां-संदर्भातील जनतेचा  संभ्रम दुर करावा. तसेच धोकादायक ब्लास्टींग बंद करावे. अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख  रविंद्र शिंदे यांनी केली आहे.

     स्थानिक  शिवनेरी मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकातून  शिवसेना जिल्हा प्रमुख  रविंद्र शिंदे यांनी सदर मागणी केली आहे. या पत्रकात असे नमूद करण्यात आले की, जिल्ह्यात असलेल्या उद्योगांनी सर्वप्रथम जनतेच्या सुरक्षेची हमी दिली पाहीजे.जनतेच्या जिवितीला धोका निर्माण करून आपले उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करणे,हे योग्य नाही.

वेकोलि व खासगी कोळसा प्रकल्पांमार्फत असे प्रकार सुरू असल्यास प्रशासनाने यावर वेळीच पायबंद घालावा. सदर मागणी बाबत लवकरच  जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येईल असेही शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये