माजरी येथील वादळात नुकसानग्रस्त झालेल्या घरांचे शासनाकडून पंचनामे
नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून त्वरित आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तालुक्यातील माजरी गावातील गारपिटासह झालेल्या वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या घरांची व दुकानांची शासनाकडून दिनांक 8 रोज बुधवार ला पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले व नुकसानीचा आढावा घेण्यात आला. आज दिवसभरात वादळाने पडझड झालेल्या 41 घरांची कोतवाला तर्फे पाहणी करून पंचनामे करण्यात आले. त्यामुळे आता नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा बळावली आहे.
दिनांक सात रोज मंगळवारला दुपारी दोन वाजता माजरी गावाला गारपिटासह झालेल्या वादळी पावसाने झोडपले होते.या वादळात गावातील जवळपास 50 घरांचे नुकसान झाले. या वादळामुळे गावातील अनेक वृक्ष कोसळले तर अनेक घरांची छप्पर उडून नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून त्वरित आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मागणी येथील नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.