परसोडा चुनखड्डी अन्नत्याग आंदोलन
प्रकृती बिघडली प्रशासनाचे दुर्लक्ष ; आंदोलन चिघडणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
उपविभागीय अधिकार्याचे सुचना तोडगा निघेपर्यंत कामबंद
कोरपणा तालुक्यातील परसोडा येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या चुनखडी उत्खनन खदानीचा वादचिघळला असून नेमीचंद काटकर यांचा आंदोलनाचा तेरावा दिवस उजाडला आहे मात्र प्रशासनाकडून व सिमेंट कंपनीकडून सकारात्मक भूमिका घेत नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण होत आहे याबाबत जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या व सिमेंट कंपनीच्या दोन तीनदा सभा झाल्या मात्र यावर कोणत्याही तोडगा निघाला नाही गावालगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण गाळण झाल्याने मोठमोठे खड्डे पडलेले आहे.
आरसीपीएल कंपनीने प्रथम दलालाच्या माध्यमातून जमीन खरेदीचा सपाटा सुरू केला होता पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी जमिनीचे इसार पत्र करून जमिनी मातीमोल भावाने पाच ते दहा लाख रुपये या दरात दलालानीआपल्या घशात पाडण्याचा प्रयत्न केला व याबाबतचे इसार पत्र देखील करण्यात आले मात्र हया जमीनी वर्ग दोन व बोमेवार शिटपिटीशन २००९ मध्ये विवाद ग्रस्त व वनक्षेत्र असल्याचा अहवाल तहसिलदार यांनी दिला मग विक्री व्यवहार व गायरान जमीन बाबत सर्वोच्च न्यायलयाने निर्देश दिले असताना दलालाचा खरेदी व्यवहार झाला कसा? शेतकऱ्यांनी या शेतजमिनी कंपनीला देण्यास नकार दिला असून आम्ही या भावात जमिनी देणार नाही अशी भूमिका घेतली आहे कंपनी व्यवस्थापन गोरगरिबावर अन्याय करून श्रीमंत लोकांच्या जमिनी 35 लाख रुपये दराने खरेदी करून रजिस्टर केल्या व नोदंणी खरेदी खत करत असताना सतरा लाख 50000 रुपये दराणे रजिस्ट्री करून शासनाचा महसूल बुडविला मात्र कंपनीची दुटप्पी भूमिका ही शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागली असून खरेदी भाव मध्ये भेदभाव करणे व आदिवासी कुटुंबाचा छळ करण्याचा प्रकार आहे.
या गावातील शेतजमिनी तोडगा काढून योग्य दरामध्ये खरेदी करावे प्रकल्प बाधित कुटुंबाला नोकरीची हमी द्यावी त्याचबरोबर या परिसरातील गावापासून वेगळा रस्ता कंपनीने निर्माण करावा इत्यादी मागणी घेऊन आंदोलन सुरू आहे येत्या 31 तारखेला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज जी अहीर यांनी या प्रश्नाला घेऊन विभागीय आयुक्त स्तरावर केंद्रीय खनि कर्म विभाग महसूल विभाग पर्यावरण विभाग व प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची तसेच कंपनी व्यवस्थापनाची सुनावणी आयोजित केली आहे येत्या 31 तारखेला परसोडा ग्रामपंचायत ग्रामसभेचे आयोजन करून आम्ही जमिनी देण्यास तयार नाही व पेसा क्षेत्रातील तसेच चंद्रपूर जिल्हा हा प्रदूषित जिल्हा म्हणून जगाच्या पातळीवर प्रसिद्ध झालेला आहे यामुळे जल जंगल जमीन व मानव जीवन धोक्यात आल्यामुळे आम्हाला चुनखडी करिता जमिनी द्यायच्या नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
यावेळी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसचिव आबिद अली यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन गावकऱ्यांची चर्चा केली. गावकरी आपल्या मागणीवर ठाम असून उपविभागीय अधिकारी मोरे तहसीलदार वाटकर व पोलीस अधिकारी यांनी आज उपोषण मंडपाला भेट देऊन समज घालण्याचा प्रयत्न केला व आपल्या एक ते बारा मागण्याबद्दल शासन स्तरावर अहवाल पाठवण्यात येईल असे सांगितले मात्र गावकरी व उपोषण करते हे आंदोलनावर ठाम असून 31 तारखेची जन सुनावणी व 31 तारखेच्या ग्रामसभेनंतरच चर्चा करण्यात येईल अशी ग्रामस्थानी भूमिका घेतली. गावकऱ्यांची तीव्रता लक्षात घेता आंदोलन तीव्र करून या ठिकाणी खोदकाम होऊ देणार नाही अशी भूमिका सखाराम तलांडे विलास काटकर कौस्तुभ मानकर भारत बहादे विस्तारी गोणलवार व उईके यांनी दिली आहे आरोग्य विभागाचे मेडिकल अधिकारी व त्यांची चमू उपोषणकर्त्याची तपासणी व उपचार करीत आहे ग्रामपंचायतच्या सरपंचांनी याबाबत कठोर भूमिका घेतली असून हा प्रकल्प इथे नकोच हे ग्रामसभेतून आम्ही सिद्ध करू असा दावा केला आहे