ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगावराजा शहरातील सर्व बँकांच्या एटीएम मध्ये (कॅश) पैसे नसल्यामुळे नागरिकत्रस्त 

बँकेच्या विरोधात जय शिवसंग्राम संघटना आक्रमक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील सर्व बँकांच्या एटीएम मध्ये आठ दिवसापासून (कॅश) पैसे नसल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे सध्या सणासुदीचे दिवस असून व मुस्लिम समाजाचा रमजान महिना सुरू आहे, सरकारने सर्व कामे ऑनलाईन केल्यामुळे बँकेचे ही सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.

लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहे नागरिकांना व ग्राहकांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांना एटीएम चा सहारा घ्यावा लागत आहे, शहरातील सर्व बँकेच्या एटीएम मध्ये आठ दिवसापासून खनखनाट आहे, बँकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये व ग्राहकां मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, तरी सर्व बँकांनी रीतसर एटीएम मध्ये कॅश पैसे ठेवावे व ग्राहकांना नागरिकांचे समाधान करावे अन्यथा जय शिवसंग्राम संघटना बँकेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेईल असा इशारा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदनावरतालुकाध्यक्ष जहीरखान, शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, राजू गव्हाणे, अनिस शहा, आदिल शेख, संतोष हिवाळे, सुरेश निकाळजे, साजिद खान, किशोर वाघ, असलम खान, दीपक मोगरकर, राजेश भाग्यवंत आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये