नागभीड तालुक्यात भात पिकाची रोवणी अंतिम टप्प्यात.
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
चंद्रपूर जिल्यातील पूर्व भाग भात पिकासाठी प्रसिद्ध असलेला नागभीड तालुका भात पिकासाठी महत्वाचा मानला जातो. या तालुक्यातील अनेक धान संशोधन करून जागतिक पातळीवर धान संशोधन केल्याने तालुक्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
तालुक्यात नागभीड व तळोधी परिसर भाताच्या विविध प्रजातीसाठी प्रसिद्ध असल्याने देशाभाऱ्यातून तांदूळ /भात मालाला मोठया प्रमाणात मागणी येत असल्याने भात पिकाची लावणी केली जाते. जून महिन्यापासून भात पिकाची लागवड सुरु करून ऑगस्ट महिन्याच्या १५ऑगस्ट पर्यंत भात लावणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची स्थिती दिसून येत आहे. भात उत्पादणाला मोठ्या प्रमानात मागणी असल्याने भात पीक तालुकाभर लावणी केली असल्याने खरीप पीक मोठया प्रमाणात घेतले जात असल्याचे वर्षानुवर्षी दिसत आहे.