शेतीच्या पेरणीसाठी शासकीय व बाजार मूल्याच्या 50 टक्के या पद्धतीने बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित द्यावे.
जय शिवसंग्राम संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अवघ्या काही दिवसात पेरणीचे दिवस येत आहे सध्या बँका मार्फत शेतकऱ्यांना एकरी 10 ते 15 हजार रुपये प्रमाणे कर्ज देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बँकेने तर्फे दिले जाणारे कर्ज कमी पडत असल्याने 10 ते 15 हजार खर्च हा शेतीला न परडवणारा आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना सावकाराकडून पेरणीसाठी आव्वा सव्वा व्याज दराने कर्ज घ्यावे लागत आहे. पेरणीसाठी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यास शेतकऱ्यांना आत्महत्या हेच पर्याय उरत आहे तरी बँकांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे कर्ज द्यावे किंवा शासकीय व बाजार मूल्याच्या 50% भावाने बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे.
अन्यथा शेतकऱ्याच्या हितासाठी जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे,. निवेदनावर तालुकाध्यक्ष जहीरखान, शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, मुबारक चाऊस, राजू गव्हाणे, अनिस शहा, आदिल शेख, संतोष हिवाळे, सुरेश निकाळजे, साजिद खान, किशोर वाघ, असलम खान, इमरान शेख, राजेश भाग्यवंत आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.