गडचांदूर नगरपरिषदेला स्वतंत्र मुख्याधिकारी कधी मिळणार ?
नगर परिषदचा डोलारा प्रभारीच्या भरवश्यावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
एका मुख्याधिकारीकडे चार नगरपालिकेचा भार तर एकही स्थायी अभियंता नाही
औद्योगिक शहर असलेल्या गडचांदूर नगरपरिषदचे कामकाज प्रभारीच्या भरवश्यावर सुरू असून मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेरकी यांच्या बदलीनंतर डॉ. सुरज जाधव यांचेकडे प्रभार देण्यात आलेला आहे. मुख्याधिकारी डॉ. सूरज जाधव राजुरा नगरपरिषदचे मुख्याधिकारी असून त्यांचेकडे गोंडपीपरी व जिवती नगरपंचायत तर गडचांदूर नगरपरिषदेचा प्रभार आहे. एकाच व्यक्तीकडे चार नगरपालिका असल्यामुळे निश्चितच ते कुठेही पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे,
कम्प्युटर अभियंता आणि निवडणूक विभाग प्रमुख असलेले प्रितेश मगरे यांची बढती झाली. त्यांच्याठिकाणी कोणीही नवीन आलेले नसल्यामुळे त्या विभागाचे पद रिक्त आहे. नगररचना अभियंता हेमंत भुजबळ यांची बदली झाली अभिनंदन काळे यांचेकडे प्रभार देण्यात आला परंतु ते महिन्यातून एक – दोनदाच येतात. शहर स्थापत्य अभियंता अनुप भगत यांनी बदली झाली त्यांचे ठिकाणी राजुरा येथील रत्नाकर वाढई यांचेकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला. ते पंधरवाड्यातून एकदाच येतात. पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता विभागात असलेले स्वप्नील पिदूरकर यांची चामोर्शी येथे बदली झाली अजूनपर्यंत त्यांचे जागी कोणीही नाही जागा रिक्त आहे. विद्युत अभियंता अमित निमकर महिनाभराच्या रजेवर आहे.
एकाच नगरपरिषदमध्ये एवढे अधिकाऱ्याचे पद रिक्त असताना गावाच्या समस्या कशा सुटणार. अधिकारी नसल्याने अनेक कामे खोळंबलेली आहे.
गडचांदूर शहराला अधिकारी देणार का अधिकारी म्हणण्याची वेळ आलेली आहे.लोकप्रतिनिधी नी याकडे लक्ष वेधून,कायम स्वरूपात स्वतंत्र मुख्याधिकारी, देऊन रिक्त असलेले अभियंता पद भरावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मी नगरपरिषद कडे नमुना आठ मिळण्याकरिता अर्ज केला परंतु अधिकारी नसल्याने कर्मचारी टाळाटाळ करत आहे. मुख्याधिकारी यांची व बांधकाम अभियंता यांची भेट मिळावी यासाठीही अर्ज केला परंतु अजूनपर्यंत भेटीसाठी त्यांचा वेळ मिळाला नाही.
राजू चौधरी,नागरिक, गडचांदूर