चांदा ब्लास्ट –
अतुल कोल्हे भद्रावती :-
तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आष्टा येथे प्रेमी युगलांचा विवाह लावून दिला.
आष्टा येथील गजानन भाऊराव कारमेंगे (26) व तेथील किरण राजू गुरुनुले (24) यांनी तंटामुक्त समिती कडे लग्न लावून देण्याची विनंती केली होती. त्या नुसार महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष दिवाकरजी शेंडे यांनी दोघांची कागदपत्रे तपासून त्यांचा विवाह माँ माणिका मंदिर येथे पंचासक्षम लावून दिला. यावेळी सरपंच चांगदेव भाऊ रोडे, सुहास बहिरे पोलीस पाटील, निखिल तिवाडे, किशोर कावडे, हरीश राजु कारमेगे, संजय ददमल, चेतन कारमेंगे तसेच गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते. विवाहा नंतर दोन्ही वर व वधुला शुभेच्या देण्यात आल्या.