शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांना सेस कर मुक्त करा
पणन थेट परवाने द्या - महासंघाची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
चंद्रपूर जिल्ह्यातील 52 शेतकरी उत्पादक कंपन्यांचा महासंघ तयार झाला आहे जिल्ह्यातील 50 हजार पेक्षा अधिक शेतकरी सभासद या उपक्रमामध्ये सहभागी झाले असून शेतकरी उत्पादक वस्तू विक्री व मूल्यवर्धन साखळी निर्माण करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचा धान्य उत्पादित खरेदी विक्री व्यवस्थेकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवाने घेऊन खरेदीचा व्यवसाय थाटला आहे मात्र अल्पभूधारक व शेतकरी सभासदांचे धान्य खरेदी करीत असताना अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या ना अडत छुपा कर न लावता शेतकऱ्याकडून बाजारभावाने खरेदी करतात यामुळे कमी नफा शेतकऱ्याचा फायदा यावर आधारित खरेदीचा व्यवसाय सुरू असून शेतकरी उत्पादक कंपन्यावर लावण्यात येणारे शेष कर मुक्त करण्यात यावे.
तसेच पणन महासंघाकडून इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांना परवाने उपलब्ध व्हावे सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा शेतकऱ्याचा फायदा हा ब्रिद वाक्य लिप्त होत चालला असून बाजार समितीचा कायदा व्यापाऱ्याचा फायदा या धर्तीवर जिल्ह्यामध्ये जिनिंग मालकांनी कापसाबरोबर सोयाबीन चना तूर खरेदी करून बाजार समितीच्या बाजार मार्केट यार्डवर खरेदी व लिलाव पद्धत बाजार समितीच्या निष्काळजी मुळे लुप्त होत असून थेट व्यापाऱ्यांच्या दारावर मालविक्रीची नामुष्की शेतकऱ्यावर आलेली आहे बाजार समितीचे मापारी खरेदी केंद्रावर राहत नाही सौदा पट्टी फाडल्या जात नाही अनेक बाजार समितीमध्ये लिलाव पद्धती मोडकळीस येत असल्यामुळे बाजार समीती चे उत्पादन घटले आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादित धान्य कापूसलिलाव न करता थेट व्यापाऱ्यांच्या दारात विक्री होणारी पद्धत बंद करून जिल्हाभर बाजार समितीच्या माध्यमातून लिलाव पद्धतीने विक्री होण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे या जिल्ह्यामध्ये कापूस तूर चना गहू धान उत्पादन मोठ्या प्रमाणात होते मात्र खरेदी करणाऱ्या नो डल एजन्सी ह्या पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील आहेत विदर्भामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी विदर्भ पातळीवर महासंघाच्या माध्यमातून नोडल एजन्सीला मान्यता देऊन विदर्भातील शेतकऱ्यांना झुकतेमाप देण्यात यावं त्याचबरोबर विदर्भामध्ये प्रक्रिया करणारे उद्योग बाळासाहेब ठाकरे स्मार्टप्रकल्प अंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसाहयातून उभे होत असताना सुलभ व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अटी व शर्ती मध्ये शिथिलताआणण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र प्रगतशील शेतकऱ्यांचे क्षेत्र म्हणून ओळख आहे मात्र विदर्भातील परिस्थितीविरोधाभास असून या ठिकाणी वाढते औद्योगीकरण वाढते तापमान व सातत्याने उत्पादनात होणारी घट यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या सारखा प्रकार वाढत असल्याने मूल्यवर्धन साखळी हा पर्याय म्हणून विदर्भातील शेतकऱ्याकडे शासनाने सिंचन क्षेत्रात वाढ परंपरागत शेतीमध्ये बदल ऊस व बांबू लागवडीकरिता योजना तयार करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी धोरण ठरविण्यात यावे व शेतकऱ्यांना बाजार भाव योग्य प्रकारे मिळावे दलाली व अडवणुक यामधून सुटका व्हावी यासाठी शेतकरी उत्पादक कंपनींना सेस करमुक्त खरेदीला संधी द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट महासंघाचे उपाध्यक्ष आबिद अली संचालक गणेश वाभिटकर यांनी भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.