सावधान! पुढे गतिरोधकाचे गाव आहे – अवाढव्य बेढप गतिरोधक डोखेदुकी
अबब तब्बल २८ गतिरोधक ; कित्येक रुग्ण दगावण्याची शक्यता
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
तालुक्यात जर कुनाला विचारले कि गतिरोधकाचे ( ब्रेकरचे ) गाव कोनते तर आपसुकच एकच नाव समोर येईल ते म्हणजे “माजरी” असे का? तर गावतील रस्ते आणि रस्त्यावरील गतिरोधक गाव सुरु झाल्या पासुन गावातील रस्ता संपत पर्यंत तब्बल २८ गतिरोधक ( ब्रेकर ) आहेत. वाहनांची गती वाढु नये तथा अपघात होऊ नये म्हणुन गतिरोधकाची निर्मिती केली जाते. परंतु गावातील फक्त २ किमी च्या अंतरामधे तब्बल २८ गतिरोधक म्हनजे सरासरी काढल्यास 70 – 75 मिटर वरती एक गतिरोधक. त्यातही रस्त्यावरील खड्डे हे सुद्धा गतीरोधकाचे काम बजावताना दिसतात. गतिरोधक असने हे फायद्याचेस असते मात्र माजरीतील हे गतीरोधक डोकेदुखी ठरत आहेत. अवाढव्य बेढप असे गतिरोधक निर्माण करुन ठेवले आहेत. त्यामुळे गाड्यांच्या चेचेस म्हणजेच खालील बाजूस मार सुद्धा लागत असतो. त्यातही भर म्हणजे अरुंद रस्ते. एकतर अनेकांना मनक्याचा व कमरेचा त्रास वाढला आहे. विशेष म्हणजे गावातील एका बाजुला लोक वस्ती, कर्मचारी वर्ग वास्तव्य करतो तर दुसर्या टोकावर वेकोली एरीया दावाखाना आहे. आपातकालीन एख्याद्याला ( गरोदर महीला, ह्दयविकार रुग्ण ) दवाखान्यात नेण्याचे झाल्यास ५ मि. चा रस्ता हा १५ ते २० मि. मधे परिवर्तीत होतो. तसे तर गतिरोधक बनवत असताना पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यायची असते पण त्यातील गतिरोधकाची परवानगी सुद्धा घेतले आहे कि नाही हे थंड बस्त्यात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा ह्या समस्येकडे कानाडोळाच केल्याचे दिसत आहे. ह्या गतिरोधकांमुळे होनार्या नुकसानीला जबाबदार कोन? असा प्रश्ना गावकरी तथा प्रावसी करत आहेत.