वरोरा व भद्रावती शहरातील महत्वाच्या चौकात वाहतूक सिग्नल लावण्याची मागणी
भाजपा अभियंता सेलचे आ. देवताळे यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती व वरोरा शहरातील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दोन्ही शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. याचा त्रास दोन्ही शहरातील नागरिकांना होत आहे. सिग्नल नसल्यामुळे या शहरांमधे अनेक अपघातही झाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरातील महत्त्वाच्या चौकातील वाहतूक असुरक्षित झाली आहे. त्यामुळे भद्रावती व वरोरा शहरातील महत्त्वांच्या चौकांमध्ये वाहतूक सिग्नल लावण्याची मागणी भाजपा अभियंता सेलचे प्रदेश सदस्य तथा राज्य अभियंता संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जगदीश लवाडिया यांनी एका निवेदनाद्वारे आमदार करण देवतळे यांच्याकडे केली आहे.
वरोरा व भद्रावती शहरातील वाहतुकीचा वाढता व्याप लक्षात घेता वरोरा शहरातील आनंदवन चौक व रत्नमाला चौक तर भद्रावती शहरातील टप्पा चौक व जुने बस स्थानक चौक येथे वाहतूक सिग्नल लावण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना भाजपा अभियंता सेलचे पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते.