ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आजी – माजी प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा स्नेहमिलन सोहळा थाटात व उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट

जुनी शाळा – जुने शिक्षक समूह सिरोंचा व स्नेहमिलन सोहळा आयोजन समिती सिरोंचातर्फे नुकताच स्थानिक राजे धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचा येथे आजी – माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला १९८९ पासून तर आजतागत कार्यरत असलेले आजी – माजी प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज आत्राम यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून करण्यात आले.त्यानंतर दोन्ही शाळेतील स्वर्गस्त झालेल्या प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटन भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,नवरगाव – चंद्रपूरचे अध्यक्ष किशोर महालक्ष्मे यांनी केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राजे धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचाचे प्राचार्य गणेश तगरे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक श्रीधराचारी मामीडालवार, भाजपा सिरोंचाचे ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार,स्वागताध्यक्ष अशोक काडबाजीवार आणि प्रमुख उपस्थिती म्हणून माजी प्राचार्य पुंडलिक जाधव,माजी प्राचार्य अर्जून दाते, माजी प्रभारी प्राचार्य वेंकटसुब्बाराव चिंतलपूडी,माजी प्राध्यापक त्रिशरण दिवे,माजी शिक्षिका लता दिवे,माजी शिक्षक विलास गुज्जनवार,माजी शिक्षक चंद्रभान झलके,माजी लिपिक विठ्ठल नागपूरे,माजी विद्यार्थी तथा स्नेहमिलन सोहळा आयोजक महेश कोलावार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे आयोजक महेश कोलावार मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की गेल्या ४ वर्षांपासून माझ्या मनात सदर कार्यक्रम घेण्याचे विचार चालू होते.मध्यंतरी काळात माजी प्राचार्य सुभाष तोटावार यांनी जुनी शाळा – जुने शिक्षक समूहात एकदा कार्यक्रमासंदर्भात आठवण करून दिली. त्यानंतर मी मागच्या वर्षी ८ डिसेंबर २०२५ ला कार्यक्रम घेण्याचे ठरवून समूहात यासंदर्भात माहिती टाकून काही मान्यवर शिक्षकांसोबत चर्चा केली.ही चर्चा २,३ दिवस रंगत गेली व पूर्णपणे कार्यक्रम घेण्याचे ठरविले.तिथून सुरुवात झालेला स्नेहमिलन सोहळ्याचा प्रवास सलग ४१ दिवस अविरत,अविश्रांतपणे दरदिवशी विविध प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना संपर्क करीत अखेरीस ४२ व्या दिवशी सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने कार्यक्रमाच्या रूपात घडून आला याचे आपण सर्व साक्षीदार आहोत.हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश म्हणजे १५ वर्षापूर्वी या कनिष्ठ महाविद्यालयात मी एक विद्यार्थी होतो. आज शाळा व गाव सोडून १५ वर्ष पूर्ण होत आहे.तरीपण दरवर्षी एकदातरी शाळेला सदिच्छा भेट देत असतो.आज मी अनेक ठिकाणी नेतृत्व करतोय.ते नेतृत्वगुण व त्याला लागणारे संस्कार मला त्याकाळी या दोन्हीही शाळेने व शिक्षकांनी दिले,म्हणून आज हे सर्व शक्य होत आहे.अश्या शाळेत परत एकदा एक सुंदर दिवस घालवत जुन्या आठवणींना उजाळा द्यावा व सोबतच माझ्या शैक्षणिक काळातील आणि माझ्या अगोदर तसेच माझ्यानंतर कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांना गोळा करावा याच सदविचाराने हा कार्यक्रम मी घेण्याचा ठरविला होता.तो कार्यक्रम आज सर्वांच्या साक्षीने होत असल्याचे मला अत्यंत आनंद आहे,याचे खरे शिल्पकार आपण सर्व आहोत असे गौरवोद्गार महेश कोलावार यांनी यावेळी काढले.

उद्घाटकीय भाषण करतांना उद्घाटक किशोर महालक्ष्मे म्हणाले की आयुष्यात ठिकठिकाणी आपण कार्यरत असतो व तिथून निवृत्तही होत असतो,पण निवृत्त झाल्यावर देखील त्या ठिकाणी परत जाण्याची इच्छा ही नेहमी होत असते.परंतु प्रत्येक जण संधीची वाट पाहत असतो ती संधी आपल्याला स्नेहमिलनाच्या माध्यमातून मिळत असते आणि ती संधी या शाळेतल्या आजी – माजी प्राचार्य,मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना आयोजकाच्या माध्यमातून मिळाली आहे. अश्या कार्यक्रमात मलाही यायला मिळाले याचे मला अधिक आनंद होत आहे अश्या शब्दात किशोर महालक्ष्मे हे आपल्या अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषण करतांना प्राचार्य गणेश तगरे म्हटले की स्नेहमिलन सोहळ्याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला एकत्र यायला मिळते व शाळेतल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायला मिळते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या आधी प्राचार्य पदावर राहिलेल्या वरिष्ठांना व शाळेतल्या जुन्या सहका-यांना भेटण्याची संधी मिळाली.हा कार्यक्रम या कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व आयोजक महेश कोलावार यांनी घेण्याचे ठरवून आज कार्यक्रम घेत आम्हा सर्वांना एकत्रित केले. त्यामुळे ते अभिनंदनास पात्र असून असे कार्यक्रम नेहमी व्हावेत ही आमची सदिच्छा आहे अशी भावना गणेश तगरे यांनी व्यक्त केली.

त्यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले व बाहेर गावावरून आलेले माजी प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी आपल्या शैक्षणिक काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत भावूक झाले.सोबतच उच्च प्राथमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थित काही शिक्षकांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

सदर कार्यक्रमात दोन्हींही शाळेतून निवृत्त झालेल्या शहरातील काही माजी प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा व उपस्थित दोन्हीही शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा आणि आयोजकांच्या आई-वडिलांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच अनुपस्थितीत राहिलेल्या पाहुण्यांचा, सत्कारमुर्तींचा,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा घरोघरी जाऊन सत्कार करण्यात आले.

यामध्ये प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते ब्रिजभूषण पाझारे,नायब तहसिलदार जितेंद्र गादेवार,माजी शिक्षक अशोक हजारे,सत्कारमुर्ती माजी प्राचार्य शेख मदार शेख जमाल,शिक्षिका साबेरा कुरेशी,शिक्षकेत्तर कर्मचारी आशालू मादेशी,प्राध्यापक माधव वेनमपल्ली,साईकिरण पद्मगिरीवार,राजय्या दुर्गम,शिक्षक मोहम्मद इमरान,अनिल देवगडे, संतोष रच्चावार,गंगाधर बल्सीपल्ली,दादाजी हेपट,सुशांत नारनवरे, शिक्षकेत्तर कर्मचारी सय्यद मुदेस्सर अली, यादव कन्नाके,अशोक पेराला,आशा गुंटी,ललिता रंगुवार आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाप्रसंगी सत्कारमुर्ती माजी पर्यवेक्षक किष्टय्या कोम्मेरा,माजी प्राचार्य नारायण तोकलवार,पापय्या नरेडला,माजी मुख्याध्यापक मोहम्मद इशाख,माजी उपमुख्याध्यापक किष्टय्या पेद्दापल्ली,माजी शिक्षक फसाद हुसेन,माजी शिक्षकेत्तर कर्मचारी पापा हकीम,स्वामी मादेशी,रामन्ना कडार्ला, मदनय्या येर्रोला व अर्चना नगराळे,प्रमिला कोलावार,चंद्रय्या कोलावार,प्राध्यापक नरसिम्हा आरवेल्ली,हिरामण तागडे,शिक्षक विश्वेश्वरराव कासर्लावार,श्यामराव लेंडे,संतोष जुनघरे,कोटेश्वर मादरबोईना, प्यारेलाल उमरे, अरूण नरेडला,किशोर सिडाम, रोहित नगारे,शिक्षिका मयुरी नागुला,अर्चना आत्राम, शिक्षकेत्तर कर्मचारी स्नेहांकिता कुंभारे,अनुष्का नगराळे,मोहन गुडा,सुशिला नागुला व बंडू लाकडे,हेमंत रुद्रपवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छायाचित्रकार आकाश घोडमारे,अलोणे साऊंड डेकोरेशनचे संचालक नरेश अलोणे,श्रीधररेड्डी निवासालयाचे संचालक श्रीधररेड्डी शेनिग्यारपू, श्रीराम जल केंद्राचे संचालक धनंजय पेंड्याला, स्वयंपाकी राकेश मादेशी,विद्यार्थी पूर्णेश पेंड्याला,साईचरण तुमनूरी,श्रीधर सोधरी, तिरूपती जिल्लापल्ली,नागराज गौरारपू, रजनीकांत परसाबोईना, श्रीनिवास जंगम, अभिषेक सप्पिडी,श्याम जंगम,सिद्धार्थ दुर्गम, संदीप बोरम,राकेश आकुदारी,महेंदर सिलवेरी, विद्यार्थीनी ज्ञानेश्वरी मोडेम,अखिला लावाडे, श्रावणी सिद्दम,दिक्षा पागे,श्रेया कावरे,सुमती पेद्दी,अश्विनी येलम,स्पंदना पेद्दी,महा मालकुरी, अनसुर्या अग्गुवार,श्रृती बोल्ले,श्रीवल्ली बोरकुट,श्रीमती लाटकरी,ऐश्वर्या चितरपू आदींनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील मेश्राम तर आभार लक्ष्मीव्येंकटरमण कोम्मेरा यांनी मानले.

              महेश कोलावार

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये