आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने राजुरा – देवाळा – गडचांदूर मार्गाने बस सुरू.
येरगव्हानवाशीयांनी माणले आमदारांचे आभार
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
राजुरा (ता. प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा येरगव्हान गावातील शालेय विद्यार्थी, नागरिक यांनी येथे राज्य परिवहन महामंडळाची बस येत नसल्याने गावातील विद्यार्थी व नागरीकांना होणारा त्रास, त्यामुळे येणाऱ्या अडचणी आमदार सुभाष धोटे यांची भेट घेऊन सांगितल्या. या सर्वाची दखल घेऊन त्यांनी राजुरा आगाराच्या व्यवस्थापकांना यासंदर्भात विशेष लक्ष देऊन या भागात राजुरा – देवाळा – गडचांदूर अशी राज्य परिवहन महामंडळाची बस सुरु करण्यात यावी असे निर्देश दिले. अखेर आगार व्यवस्थापकांनी तातडीने दखल घेऊन या मार्गाने बस सुरू केली.
राजुरा – देवाळा – गडचांदूर मार्गवर आता नियमितपणे सकाळी गडचांदूर ते राजुरा आणि सायंकाळी राजुरा ते गडचांदूर अशा दोन फेऱ्या ही बस मारीत असून या भागातील शालेय विद्यार्थी, नागरिकांनी आपल्या विनंतीची दखल घेऊन बस सुरू केल्यामुळे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले आहेत.