ताज्या घडामोडी

वरोरा – वणी रस्त्यावरील वर्धा नदीचा 60 वर्षे जुना पूल मशिनद्वारे केला उध्वस्त

राष्ट्रीय महामार्ग वरोरा - वाणी रोडवरील पाटाळा वर्धा नदीवरील नवीन पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू

चांदा ब्लास्ट :

अतुल कोल्हे भद्रावती :-
वरोरा-वणी रस्त्याच्या पाटाळा गावच्या वर्धा नदीच्या 60 वर्षे पुलाला अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गुरुवार, 15 जून रोजी पुलाच्या दोन्ही बाजूला मशिन बसवून जुना पूल पाडण्यात आला आहे.
या कामाची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि वणी-वरोरा महामार्गावर कार्यरत असलेल्या अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे आहे. पूल पाडल्यामुळे स्थानिक पाटाळा गावातील लोक प्रचंड संतापले आहेत.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने ठिकठिकाणी शेताकडे जाणारा रस्ता बंद केल्याने पाटला गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात कामावर जाणे कठीण होणार आहे.
पाटाळा गावचे सरपंच वींजेद्र वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व ग्रामस्थांनी अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 60 वर्षे जुना पूल न पाडण्याचे निवेदन दिले होते, मात्र अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रशासक संजीव कुमार यांनी त्यांची विनंती मान्य केली नाही. आज पूल पाडण्यात आला.
व राष्ट्रीय महामार्ग वरोरा वाणी रोडवरील पाटाळा वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना कोणतीही अडचण नाही.परंतु शेतकरी मात्र चिंतेत आहेत. या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही, मग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी हा पूल पाडण्याची एवढी घाई का करत आहे, असा प्रश्न पाटलाच्या ग्रामस्थांच्या मनात आहे.
वर्जन- वरोरा वणी रस्त्यावर नवीन पुलाचे काम झाले मात्र जुना पूल तोडण्याची गरज नाही.वर्धानदी च्या काठावर शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे, शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, बैलबंडी किंवा शेतीची अवजारे, बियाणे आणि इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटरचा प्रवास झोला गाव चौक आणि पाटाला चौकापर्यंत करावा लागतो. हा पूल पाडू नये, यासाठी आम्ही निवेदनही दिले असून, आज पाटाला व परिसरातील शेतकऱ्यांनी वर्धा नदीचे पूल तोडण्यास विरोध केला, मात्र त्यांनी काहीही न ऐकता तो तोडला.
विजेंद्र वानखेडे, सरपंच, ग्रामपंचायत पाटाला

वर्जन – पूल तोडण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याकडून आले. गावातील लोकांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन दिले असते तर कदाचित ते विचाराधीन झाले असते.कोणताही पूल पाडू नये यासाठी विरोध आहे हे मला माहीत नाही.
नवीन, साइड इंजिनीअर, अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये