Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा

ना. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगावराजा तालुक्यात सुरुवातीपासूनच अल्पवृष्टी असल्यामुळे पिकांचे सरासरी उत्पादन क्षमता ही घटली आहे तरीसुद्धा बळीराजांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पाणी पिकांना देऊन कसेबसे पिकांना जीवदान दिले होते परंतु पाऊसच नसल्याने तेही अपुरे पडल्यामुळे तालुक्यातील विहिरींनी अक्षरशः तळ गाठला आहे पावसाळा संपत आला तरी सरासरी पेक्षा 50 टक्के सुध्दा पर्जन्यमान झाले नाही.

त्यामुळे देऊळगांवराजा कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अत्यल्प पावसामुळे देऊळगांवराजा तालुक्यातील व परिसरातील प्रमुख पिक असलेल्या सोयाबीन, कापुस, मक्का हि पिके धोक्यात आली आहे. परिणामी यंदाचा हंगाम उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा आहे.

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही कठिण झाले आहे. अशा परिस्थितीत शेती लावगवडीसाठी लागलेला खर्च पण निघत नाही अशा बिकट परिस्थितीत शेतकन्यांना सावण्यासाठी देऊळगावराजा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील बुलढाणा दौऱ्यावर असताना तालुक्यातून जात असताना लेखी निवेदन देऊन तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा.

अशी विनंती केली निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष राजीव शिरसाठ, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर जाधव रियाज खा पठाण माजी सभापती बांधकाम जीप, समाधान शिंगणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देराजा, प्राध्यापक दिलीप कुमार झोटे, संतोष खांडेभराड माजी नगराध्यक्ष, राम विजय नरोडे, दत्ता कोल्हे सरपंच गोळेगाव, कैलास रामाने, Iqbal तिडके, गणेश बुरकुल, सौ रेणुका बु रुकुल , नारायण कोल्हे, पांडुरंग कोल्हे, लिंबाजी कोल्हे सदाशिव कोल्हे, रंगनाथराव कोल्हे, रमेश नरोडे, सुनील शेजुळकर, अशोकराव शेळके, रघुनाथ भाऊ कोल्हे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये