ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांचा मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली तरी जिवती तालुका विकासापासून कोसोदूर असल्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोज गुरुवारला (ता.२१) येथील तहसील कार्यालयावर सरकार विरोधात शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी विराट शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सध्या गगनाला भिडलेली महागाईमुळे आज सर्वसामान्यांचे हाल होत असून, राज्य व केंद्र सरकार मूग गिळून शांत बसलेले आहे; तसेच शेतकरी बांधवांना शेतमालावर न मिळणारा हमीभाव, अवकाळी पावसामुळे झालेले प्रचंड नुकसान यातून सावरण्यासाठी सरकारतर्फे कुठलीही ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या हा मोर्चा माजी आमदार वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली व सुदाम राठोड यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. यावेळी विशाल राठोड, शब्बीर जहागिरदार, विनोद पवार, गणेश कदम, नरशिंग हामने,नामदेव राठोड, कर्मराज कांबळे, नीलकंठ कोरांगे, सुनील बावणे, मिथुन चव्हाण, अमोल चव्हाण, रामेश्वर नामपल्ले, बालाजी बनसोडे, रघुनाथ पोले व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख मागण्या :-

तीन पिढ्याची अट रद्द करून तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीन पट्टे द्या.ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करा, न्यायालय, बसस्थानक मंजूर करा. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टीचा निधी जमा करावा,नगरपंचायत येथील मंजूर असलेल्या योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना लाभ द्यावा, तालुक्याच्या विकास कामासाठी लागणारी वनविभागाची विविध (NOC) ची अटी रद्द करा, भारतीय स्टेट बँक शाखा मंजूर करा,नगरपंचायत येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर असलेले ६६४ घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी परवानगी द्यावी, तालुक्यातील अतिक्रमण धारकांना घराचे पट्टे तात्काळ सर्वे करून देण्यात यावे, तालुक्यातील सर्व गाव व तांड्यामध्ये सर्वे करून गावठाणा वाढवून तात्काळ देण्यात यावे. आदी मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदार यांना देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये