ताज्या घडामोडी

‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ उपक्रमाने तलाव परिसराची स्वच्छता – निरंकारी बाबांचा जन्मोत्सव साजरा

बल्लारपूर व राजुरा येथिल भक्तांची सामूहिक स्वच्छता मोहीम

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

मानवतेसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे आध्यात्मिक गुरू बाबा हरदेवसिंह जी महाराज यांच्या जयंती निमित्त जगभर राबविण्यात येत असलेल्या अमृत प्रकल्पा अंतर्गत “स्वच्छ जल स्वच्छ मन” अभियानात संत निरंकारी चेरिटेबल फाऊंडेशन,दिल्ली च्या बल्लारपूर शाखेने सक्रिय सहभाग नोंदविला असुन अनुषंगाने नदी, तलावाच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जयंतीच्या अनुषंगाने मिशनद्वारे जगभर स्वच्छता अभियान राबवून बाबा हरदेव सिंह ह्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.

मिशन द्वारे आखून दिलेल्या नियमानुसार बल्लारपूर शाखा प्रभारी बहन मीना मत्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर – राजुरा परिसरातील सर्व स्त्री-पुरूष सेवादल तथा साथसंगत यांच्या सहकार्याने राजुरा नगर परिषदेच्या समोरील माजी मालगुजारी तलावाच्या आसपासची संपूर्ण परिसराची साफसफाई सकाळी ७ ते १० या वेळेत करण्यात आली. सदर स्वच्छता अभियान सफल करण्यासाठी राजुरा तथा बल्लारपूर येथील निरंकारी मिशनचे महात्मा केशकर, मनोज माडुरवार, उरकुडेजी, धोटे महाराज, राजु रोगे, लांडे, राजु नक्का, थेरे, तडसे, उलमाले, सुधीर डोडा, मत्ते, बहन सिंधु डोडा, माया रोगे, उरकुडे, थेरे, नक्का, आहुजा, लेखराजणी, डाहुले तथा सर्व सेवादल साथसंगत नी सद्गुरूंच्या आदेशाचे स्वच्छ जल स्वच्छ मन योजना कार्यान्वित केली.

राजुरा साथसंगत चे सदस्य घनश्याम आहुजा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्यातर्फे सर्वांसाठी चहा-बिस्किट तथा लंगर च्या माध्यमातून सद्गुरूंचा आशीर्वाद प्राप्त केला.

सदर स्वच्छता अभियानाला राजुरा नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी राजुरा तसेच स्वच्छता विभाग प्रमुख पुणेकर तथा त्यांच्या सहकाऱ्यांनी साफसफाई साहित्य, घंटा गाडीची व्यवस्था करून दिली.त्याबद्ल मिशनच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये