ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त केवळ काँग्रेस पक्ष करू शकतो – विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार हे शेतकरी विरोधात असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला नाही. सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना शासन करोडो रुपयांची उधळण शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर करीत आहेत, शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त केवळ काँग्रेस पक्ष च करू शकतो तेव्हा आगामी निवडणुकीत ट्रिपल इंजिन सरकार ला घरी बसवून इंडिया सरकार स्थापन करण्यास सहकार्य करावे असे आवाहन विरोधी पक्षनेते ना विजय वडेट्टीवार यांनी देऊळगाव राजा येथे आयोजित भाव जनसंवाद सभेत बोलताना केले,
सभेच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोन्द्रे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार धीरज लिंगाडे,हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे,दिलीप सानंदा,नंदाताई कायंदे, संजय राठोड आदी उपस्थित होते,
विजय वडेट्टीवार यांनी सत्तारूढ राज्य व केंद्र सरकार वर कडाडून हल्लाबोल केला,राहुल गांधी ला मोदी सरकार घाबरले असून येणारे सरकार राहुल गांधी च्या नेतृत्वाखाली राहील असा विश्वास व्यक्त केला,
राज्यातील सरकार ट्रिपल इंजिन चे असून टी व्ही एक व रिमोट तीन चे सरकार असून, भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना ईडी चा धाक दाखवून सत्तेत सहभागी करून घेतले असा घणाघात केला,
विजय वडेट्टीवार यांची सभा सुरू असताना मुसळधार पाऊस पडला, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज कायंदे व शाम उमालकर यांनी केले, संचालन जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रा दिलीप सानप यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल सावजी यांनी केले यशस्वी करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन काकड, शहर अध्यक्ष विष्णू झोरे, सेवा दल काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गजानन तिडके, शेख नाजीम,लक्ष्मण कवळे,सुभाष दराडे, भानुदास कोल्हे, भगवान खरात, गणेश डोईफोडे, रामकिशन कोल्हे, आधीसह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

भव्य मोटारसायकल रॅली
ना विजय वडेट्टीवार यांचे सिंदखेडराजा येथून देऊळगाव राजा शहरात आगमन होताच पेट्रोल पंप चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य स्वागत करण्यात आले भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली, खुल्या जीप मध्ये उभे राहून वडेट्टीवार यांनी अभिवादन केले,वाटेत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, रॅली मध्ये काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये