आर्वी नाका ते कार्ला चौक पर्यन्त व सेवाग्राम रोड वर असलेले पोल अपघाताचे कारण
सदर बाबतचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा शहरात मोठ्या प्रमाणत रस्त्याचे काम झालेले आहे. खूप मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल सुद्धा करण्यात आली . काही भागात तर चांगले रस्ते फोडून त्यावर नवीन रस्ते बांधकाम सुरू आहे. पण मात्र जेथे रस्स्त्याचे काम झाले तेथील बाजूला असलेले जुने विद्युत खांब मात्र तसेच रस्त्यावर येत आहे. त्यावर अजूनही कोणती उपाययोजना केली नाही. जुन्या खांबांना स्थलांतरित करण्याचे सुद्धा टेंडर निघते पण हे काम अद्यापही झाले नाही. मुख्यतः आर्वी नाका पासून तर जुना पाणी चौक कडे मुख्य मार्गावर संपूर्ण खांब रस्त्यावर आले आहे. मागच्या काही काळात भरपूर अपघात सुद्धा या मार्गावर या खांबामुळेच झाले आहे पण अजूनही प्रशासनाने यावर कोणतीही दखल घेतली नाही.
तसेच सेवाग्राम कडे जाणाऱ्या उडानपुलापासून दवाखाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुद्धा रस्त्यावर विद्युत खांब आले आहे त्याला सुद्धा स्थलांतरित अद्यापही केले नाही . हा जाणारा मार्ग दवाखान्यात जातो तसेच सेवाग्राम पोलीस स्टेशन सुद्धा याच मार्गावर आहे व जगप्रसिद्ध बापू कुटी याच मार्गावर येते तरी असे अपूर्ण काम राहिले आहे .मग तुम्ही रस्ते बांधता तर संपूर्ण काम का करत नाही? कामाचे बिल तर पूर्ण घेतले असेल मग काम का बरं अर्धवट आहे?
लवकरात लवकर संपूर्ण अर्धवट काम पूर्ण करण्यात यावे . व हे अर्धवट काम का राहिले याची चौकशी करण्यात यावी जर कामाचे बिल नसेल आले म्हणुन जर काम अर्धवट असेल तर आम्ही वर्गणी जमा करून आपल्याला निधी आणून देतो पण मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळणे थांबवा व लवकरात लवकर उपाययोजना करा अन्यथा युवा : परिवर्तन की आवाज मार्फत आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहणार ही विनंती.
आर्वी नाका ते जुना पाणी चौक या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात हे रस्त्यावर आलेले खांब दिसतील तसेच सेवाग्राम कडे जाणाऱ्या उडानपुलापासून ते सेवाग्राम दवाखाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्युत खांब आले आहे तरी त्वरित लक्ष द्यावे.
सदर निवेदन नायब तहसीलदार चार्ज वर असणाऱ्या आळंदे मॅडम ला देण्यात आले. निवेदन देताना वर्धा जिल्हाध्यक्ष प्रितेश इंगळे, सोनू दाते, अमित भोसले,दिनेश देवतळे, रोहित कडू, दिनेश परचाके, तेजस खडसे, वृषभ मेंधुले , कल्पक मिसाळ , इर्शाद शहा, अक्षय बाळसराफ, अमन नारायने व अन्य उपस्थित होते.