ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासन आपल्या दारी अभियाना अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ देण्यास मनपातर्फे कुटुंब सर्वेक्षण सुरु

वॉर्ड सखी मार्फत १८९७३ कुटुंबांचे सर्वेक्षण पुर्ण

चांदा ब्लास्ट 

शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा या दृष्टीने नागरीकांची आवश्यक ती माहीती गोळा करण्यास चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरु Survey started through Municipal Corporation करण्यात आले असुन याअंतर्गत १८,९७३ कुटुंबांचे सर्वेक्षण पुर्ण झाले असुन ४४,४२६ घरी सर्वेक्षणास आवश्यक कागदपत्रांकरीता केवायसी फॉर्म KYC form नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.  
    शासनातर्फे विविध कल्याणकारी योजनांची आखणी करण्यात येते, या योजना लाभार्थ्यांतर्फे पोहचवुन त्याचा लाभ मिळेल याची खात्री करणे ही महानगरपालिका स्तरावर मनपाची जबाबदारी असते. योजनांची गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी मनपा हद्दीतील सर्व नागरिकांची आवश्यक ती माहीती मनपाकडे असणे आवश्यक आहे. सदर माहीतीद्वारे विविध योजनांचे विविध लाभार्थी शोधणे सहज शक्य होऊन योजनांचे लाभ लाभार्थ्यांना जलद गतीने देणे शक्य होणार आहे.
   सदर सर्वेक्षण हे नावीन्य शहर स्तर संस्थेने नियुक्त केलेल्या वॉर्ड सखी मार्फत केल्या जात असुन वॉर्ड सखी या प्रत्येक घरी भेट देत आहेत. सर्वेक्षण करण्याकरीता लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांकरीता प्रथम एक फॉर्म नागरीकांना उपलब्ध करून देण्यात येत असुन सदर फॉर्म वरील माहीती नागरीकांनी एकत्र करून ठेवल्यावर वॉर्ड सखी वैयक्तिक व कौटुंबिक माहीती Ward Sakhi Personal and Family Information वेगवेगळ्या स्वरूपात फॉर्म मध्ये भरून घेत आहेत.  
    गतिमान पद्धतीने शासन योजनांचा लाभ नागरीकांना देण्यात यावा हाच उद्देश असल्याने या सर्वेक्षण कार्यात नागरीकांनी सहकार्य करावे व वॉर्ड सखींना आवश्यक ती माहिती देण्याचे आवाहन appeal चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  
#Govt starts family survey under its Dari Abhiyan to provide benefits of government schemes
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये