शेतकऱ्यांनो! फक्त एक रुपयात पिकांना विमाकवच
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट
शेतकऱ्यांच्या पिकांना केवळ १ रुपयांत विमाकवच देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने अर्थसंकल्पात घेतला. त्याची अंमलबजावणी खरीप हंगाम २०२३ मध्ये करण्यात येत असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतक-यांनी त्वरीत नोंदणी करून आपल्या पिकांचे विमाकवच प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
यापूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एकूण विमा हप्ता रकमेच्या २ ते ५ टक्के रक्कम शेतक-यांना भरावी लागत होती. त्यामुळे बहुतांश शेतकरी या योजनेत सहभागी होत नव्हते. परिणामी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टीत नुकसान झाल्यानंतरही शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केवळ १ रुपया प्रति अर्ज या नाममात्र दराने प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२३-२४ सुरू केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खरीप २०२३-२४ या हंगामाकरीता तांदूळ, कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग व उडीद या अधिसुचित पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. सदर योजनेंतर्गत नोंदणीची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील केवळ ६७६३४ शेतकर्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेऊन ५१५५७ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. यासाठी शेतक-यांनी एकूण ५९१ लक्ष रुपयांचा विमा हप्ता भरला होता व त्या अनुषंगाने ९१०.४८ लक्ष रकमेचा विमा लाभ संबंधित शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यावर्षीच्या खरीप हंगामात केवळ १ रुपयात नोंदणी करून शेतक-यांनी त्वरीत आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ करीता सदर योजना ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनी कडुन राबविण्यात येणार आहे. सदर विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००११८४८५ असून ई-मेल pmfby.१६००००@orientalins
अडचण आल्यास यांच्याशी करा संपर्क :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी करतांना शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या संबंधित तालुका समन्वयकांशी संपर्क करावा. सदर कंपनीचे जिल्हा समन्वयक प्रतीक करपेनवार (मो. ८०८०१९२०७६) असून देवानंद रोहनकर (तालुका समन्वयक, चंद्रपूर, मो. ९५७९८०८५००), निलेश धोपटे (बल्लारपूर, मो. ९८८१५४५८०१), आशिष तुपट (ब्रम्हपुरी, मो. ९५८८६०८८४७), निहाल नागापुरे (सिंदेवाही, मो. ८४५९७३५३७१), रुपेश रोहणकर (मूल, मो. ७९७२५६४८५७), सुरज चौधरी (सावली, मो. ९५७९९५७५६२), तिलकराम चांदेकर (पोंभुर्णा, मो. ७३७८६६४४४०), संदीप बोगेवार (गोंडपिपरी, मो. ७४४८१६७२८२), अमन हजारे (भद्रावती, मो. ८२३७४५५३३८), अभिजीत गोगे (कोरपना, मो. ९०२२९८२१५८), तुषार चौधरी (वरोरा, मो. ८८०६०६६७९५), राकेश गट्टेवार (राजुरा, मो. ९४२३३१९३८३), चंद्रशेखर रेवतकर (चिमूर, मो. ९९७५०२६३५२), सुशांत निकोडे (नागभीड, मो. ८९७५७०४१२५) आणि कुणाल सिडाम (तालुका समन्वयक जिवती, मो. ७८८७३७४५१२) आहेत. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे कृषी विभागाने कळविले आहे.
एस.एम.एस द्वारे जनजागृती :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत केवळ एक रुपयात आपला पिक विमा नोंदवून घ्यावा. अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत असली तरी घाई टाळण्यासाठी तात्काळ जवळच्या सेतू सुविधा केंद्रावर अथवा ग्रामपंचायत मधून पीक विमा काढून घ्यावा. अडचण आल्यास कृषी सहाय्यकाची सहायता घ्या. अशा आशयाचा एस.एम.एस. प्रत्येक उपविभागातून शेतक-यांपर्यंत पाठविण्यात आला आहे. राजुरा उवविभागातून-४५,१३० शेतक-यांना वरोरा-३४,०२६, नागभिड-४९,४११, चंद्रपूर उपविभागातून-३९,८०९ तसेच जिल्हास्तरावरून १,६९,२८० शेतकऱ्यांना एस.एम.एस पाठविण्यात आला आहे.