Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगरपंचायत हद्दीतील पूरग्रस्तांना शासकीय लाभ द्या !

नगराध्यक्ष कविता आडे यांची निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यात मागील ५ ते ६ दिवसापासून पडणाऱ्या सततधार पावसामुळे येथील नगर पंचायत हद्दीमध्ये मोठ्याप्रमाणात नागरिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने तत्काळ सोयी सुविधा पुरवाव्यात, व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ठिकाणी नवीन बाबींचा समावेश करावा. पुराने बाधित झालेल्या भागातील नागरिकांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना कराव्यात, नागरीकांना सोयी सुविधा तत्काळ द्याव्यात, अश्या मागणीचे निवेदन

तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष कविता आडे, नगरसेवक अमर राठोड, जमालूद्दीन शेख, नगरसेविका ऊर्मिला बेल्लाळे, अश्विनी गुरमे, आदीं उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये