ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 3 बालकांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू

1 सुखरूप परतला :

चांदा ब्लास्ट :

वर्धा नदीत मासेमारी करण्यासाठी  गेलेल्या 3 मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. टोहोगाव येथील वर्धा नदीत आज दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीच्या आधारे एनडीआरएफची टीम मुलांच्या शोध मोहिमेत गुंतली आहे

प्रतिक नेताजी जुनघरे (11), सोनल सुरेश रायपुरे (9), निष्पाप ईश्वर रंगारी (10) आणि आरुष प्रकाश चांदेकर (11) हे शनिवारी सकाळी शाळा सुटल्यानंतर गोंडपिपरी तालुक्यातील टोहोगाव येथील वर्धा नदीत जाळी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने वर्धा नदीत पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मासे पकडत असताना मुले खोल पाण्यात गेली त्यात प्रतीक जुनघरे, सोनल रायपुरे व निष्पाप रंगारी यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. मात्र अरुण चांदेकर यांनी कसा तरी पळ काढत गावात याची माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी वर्धा नदीपात्र गाठून पोलीस व जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच चंद्रपूर येथील एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नदीत मुलांचा शोध सुरू केला. तसेच विरूर स्टेशन, कोठारी, तोहोगाव आणि लाठीचे एसएच ओ ही त्यांच्या पथकासह वर्धा नदीच्या काठावर पोहोचले आणि शोध सुरू केला. मात्र वृत्त लिहिपर्यंत मुलांचा शोध लागला नव्हता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये