ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बँकांकडून होणारी सक्तीची कर्ज वसुली थांबवा ; अन्यथा जन आंदोलन उभारू

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा इशारा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

         मार्च एंड च्या नावाखाली सरकारी बँका व पतसंस्थेंकडून तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून तालुक्यात सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. त्यामुळे शेतकरी व कर्जदार हवालदिल झाले आहे. कर्ज भरण्यासाठी सक्ती झाल्यास भीतीपोटी आत्महत्यासारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे कर्जदारांना कर्ज भरण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ द्यावी. सध्या सुरू असलेली सक्तीची कर्ज वसुली तत्काळ थांबवावी. अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

       राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिले होते.

मात्र सत्तेवर आल्यावर शेतकरी कर्जमाफीच्या विषयाला राज्यकर्ते पद्धतशीर बगल देत आहे. आधीच शेतमालाचे पडलेले भाव, वाढलेला उत्पादन खर्च, कुटुंबातील लग्न सोहळे यामुळे शेतकरी वर्ग कर्जाच्या खाईत ढकलल्या जात आहे. त्यात मार्चएड च्या नावाखाली सरकारी बँका, पतसंस्था, मायक्रो फायनान्स कंपन्याकडून सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. थकीत कर्ज सक्तीने वसूल केल्या जात आहे. आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. त्यात सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव करणे, लिलावपूर्वी नोटीस देणे, इतर बँक खाते गोठवणे, मालमत्ता जप्त करणे यासारखे त्रास देण्याचे प्रकार सध्या बँका,पतसंस्था, मायक्रो फायनान्स कंपनीकडून सुरू आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी, कर्जदार वर्ग हवालदील झाले आहेत.

कर्ज भरण्यासाठी सक्ती झाल्यास भीतीपोटी तालुक्यात आत्महत्या सारख्या घटनाही घडत आहे. म्हणून वित्तीय संस्थांकडून सुरू असलेली सक्तीची कर्ज वसुली थांबवावी. कर्जदारांना कर्ज स्वेच्छने भरण्याची मुभा द्यावी. तसेच कर्ज भरण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढ द्यावी, अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,शहराध्यक्ष विजय खांडेभराड, युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड,कवीश जिंतूरकर,रंगनाथ कोल्हे,राजू शिरसाट,मन्नान खान पठाण, दीपक मस्के, गणेश बुरकूल, गणेश सवडे,रामेश्वर पवार, शेतकरी नेते गजानन जायभाये आदींनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये