ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय धोरणांविरुद्ध महाविकास आंदोलन

शेतकऱ्यांचा जनआक्रोश: तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा महविकास आघाडीने वतीने मंगळवारी (दि. 1 ऑक्टबर 2024) दुपारी 12 वाजता सेलूच्या विकास चौकात डॉ. अभ्युदय मेघे यांच्या नेतृत्वात शेतकरी जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मलीक विराणी यांना देण्यात आले.

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर, शैलेश अग्रवाल, किसान अधिकार अभियान अविनाश काकडे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अमर गुंदी, नितेश कराळे, महेंद्र मुनेश्वर, रज्जन मिश्रा, तुषार देवढे , सुदाम पवार,आदी उपस्थित होते. आंदोलनात सरकारच्या शेतकरी विरोधीवर धोरणावर भाषणे देऊन निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर स्वामीनाथन आयोगाने सुचविल्यानुसार हमीभाव मिळाला पाहिजे.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, केळी पिकाला पीक विम्यात समाविष्ट करावे, ओला दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीन व कापूस पिकाला मिळणाऱ्या अनुदानाकरिता ई-पीक विम्याची साठी अटी शिथिल करावी. या व इतर मागण्या तहसिल दरांना देण्यात आल्या.या आंदोलनाला सेलू तालुक्यांतील हजारो शेतकऱ्याची उपस्थित होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये