ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनसेने दिले तक्रार निवारण करण्यासाठी निवेदन!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा तालुक्यातील तक्रार निवारण करण्यासाठीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष शुभम जळगावकर यांनी तहसिलदार देण्यात आले सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शालेय प्रवेश सुरू झाले आहे. यासाठी विविध शासकिय कागदपत्रासाठी आपले सरकार सेवा केंद्र तसेच तहसील कार्यालय येथे एकच नागरिकांची एकाच झुंबड उडाली आहे.

आपले सरकार सेवा केंद्र चालक हा शासन आणि जनते मधील दुवा म्हणून काम करत असून नागरिक सेवा केंद्रात प्रकरण सादर करून पोहोच पावती प्राप्त करून येतात. सदर कामदपत्रे महारष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 नुसार मिळकत प्रमाणपत्र अधिवास या प्रमाणपत्रसाठि 15 दिवस तसेच जात प्रमाणपत्र, नोन क्रिमीनल प्रमाणपत्र साठी 45 दिवस असा अवधि आहे.

मात्र सदर प्रकरण सादर केल्यावर वेळेत दाखले मिळत नसल्याने नागरिकाकडुन तक्रारी प्राप्त होत आहे. सदर कागदपत्रे मिळवण्याकरिता नागरिक शेतीचे काम सोडूब तहसील कार्यालय येते चकरा मारत आहे परंतु निवासी नायब तहसिलदार बाळूताई भागवत व अव्वल कारकुन प्रभाकर सुरजूसे हे मनमानी कारभार चालून नागरिकांना विनाकारण विविध कारणे देऊन नाभरिकांचे कामे न करता आणि सदर काम आमच्या मर्जीने होईल असे म्हणून हाकलून लावत असून अशा तक्रारी नागरिकांन कडून मागील एक महिन्यापासून प्राप्त होत आहे. ही शोधाची बाब आहे.

तरी आपणास विनंती आहे की, सदर तक्रारी कडे गांभीर्याने लक्ष देऊन आपण स्वता लक्ष घालून नागरिकांना न्याय यावा. सदर आपण प्रकरणात काय कार्यवाही केली याची लेखी स्वरुपात दिनांक 24/07/2024 पर्यन्त कळवावे, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन झाल्यास संपूर्ण आपण जबाबदार राहाल, याची नोंद घ्यावी.

सदर निवेदन तहसीलदार संदीप पुंडेकर यांना देण्यात आले सोबत नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये